शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

भिक्षा मागितली तर काय गुन्हा केला... मुलाची हत्या का केली...?  मातेचा आर्त टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 11:52 IST

Crime News : भिक्षा मागणे हा काय? गुन्हा आहे काय? असा आर्त टाहो रायगड जिल्ह्यात हत्या करण्यात आलेल्या नाथजोगी समाजाच्या इसमाच्या आईने फोडला.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आमच्या कुटुंबातील तरूण बहुरूपींचा वेश परिधान करून गावोगावी फिरून भिक्षा मागतात. हे आमचे परंपरागत काम असून, अनेक वर्षांपासून आम्ही अशा प्रकारे भिक्षा मागत आहोत. मात्र भिक्षा मागण्यासाठी गेल्यावर माझ्या मुलाची हत्या करण्यात आली, भिक्षा मागणे हा काय? गुन्हा आहे काय? असा आर्त टाहो रायगड जिल्ह्यात हत्या करण्यात आलेल्या नाथजोगी समाजाच्या इसमाच्या आईने फोडला.जळगाव जामोद तालुक्यातील मोहीदपूर व नाव खुर्द या गावात नाथजोगी समाजाचे नागरिक  वास्तव्यास आहेत. या समाजातील तरूण बहुरूप्यांचा वेश परिधान करून गावोगावी जाऊन भिक्षा मागतात. अनेक वर्षांपासून पिढ्यांन पिढ्यांपासून ते हेच काम करीत आहेत. अशाच प्रकारे तेजराव शालीग्राम सोळंके व तेजराव वामन चव्हाण त्यांच्या पत्नीसह रायगड जिल्ह्यात गेले होते. तेथे तेजराव सोळंके व तेजराव चव्हाण भिक्षा मागण्याकरिता गावोगावी फिरत होते, सायंकाळी ते परत आपल्या ठिकाण्यावर येत होते. मात्र, १९ जून रोजी तेजराव सोळंके परतलेच नाहीत. त्यांचा तेजराव चव्हाण व पत्नी सुनीता यांनी शोध घेतला. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये हरविल्याची माहिती दिली. त्यानंतर उरण पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तेजराव चव्हाण सापडल्याची माहिती दिली. तेजराव चव्हाण व सुनीता उरणच्या रूग्णालयात पोहोचले तर तेथे तेजराव सोळंके यांचा मृतदेहच त्यांना बघायला मिळाला. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. संपूर्ण शरीरावर मारहाण झाल्याचे दिसत होते. त्यानंतर तेजरावचा मृतदेह घेऊन पत्नी सुनीता व सहकारी मोहीदपूर गावात पोहोचले. गावात मुलाचा मृतदेह बघितल्यावर आई रेश्मा यांनी एकच हंबरडा फोडला. संपूर्ण गावावरच दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, दु:खापेक्षाही त्यांच्या मनात चीड होती, ती कोणता गुन्हा केला याची?  यापूर्वीही याची? गावातील तिघांची नागपूर येथे हत्या करण्यात आली होती. या घटनांमुळे  समाजातील अनेकांनी रोष व्यक्त केला.

गुन्हा केला असेल तर पोलिसात द्या, हत्या का करता? आमच्या समाजातील तरूण गावोगावी फिरतात. महिला व बहुरूप्यांचे वेश परिधान करतात. यात काय चुकीचे आहे? त्यांनी गुन्हा केला असेल तर पोलिसांकडे तक्रार करा, त्यांना पकडून द्या, त्यांना कायद्याने शिक्षा होऊ द्या, मात्र त्यांचे काहीही ऐकून न घेता चक्क हत्या का करता? देशात कायदा आहे? की नाही, हत्या करण्याएवढा कोणता गुन्हा ते करतात, असा सवाल मोहीदपूर गावातील महिलांनी केला आहे. 

दहा दिवसांपासून पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार तेजराव सोळंके यांची रायगड जिल्ह्यात उरण येथे हत्या झाली. मात्र, उरण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार देत, गावाला जावून तक्रार देण्याचे सांगितले. तेजराव यांचे नातेवाईक जळगाव जामोेद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांनी घटना उरण येथे घडली आहे, त्यामुळे तेथेच तक्रार देण्याचे सांगितले. घटना घडून दहा दिवस झाले तरी पोलीस तक्रार घेण्यास तयार नाहीत.

नागपूर येथे तीन तर राईनपाडा येथे पाच जणांची झाली होती हत्या मोहीदपूर येथील तीन तरूणांची नागपूर येथे ९ मे २०१२ रोजी हत्या झाली होती. यावेळी अनेक आरोप हत्या झालेल्यांवर करण्यात आले होते. तसेच धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे १ ऑगस्ट २०१८ रोजी नाथजोगी समाजातील पाच जणांची हत्या करण्यात आली. यांच्यावरही विविध आरोप करण्यात आले होते. संशयातून या समाजातील नागरिकांची हत्या करण्यात येत आहे.  

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी