शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

नांदेडमधील बेपत्ता झालेले ६५२ जण गेले कुठे ? आकडेवारी चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:58 IST

शिर्डी येथून वर्षभरात ९० भाविक बेपत्ता झाल्याचे प्रकरण उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतले आहे.

ठळक मुद्दे  आतापर्यंत २७४८ जण बेपत्ता झाल्याचे पुढे आले. यामध्ये १४२८ पुरुष तर १३२० महिलांचा समावेश आहे.

नांदेड : राज्यामध्ये शिर्डी येथील बेपत्ता नागरिकांचे प्रकरण नुकतेच ऐरणीवर आले आहे. यानंतर नांदेड जिल्ह्यातील आकडेवारीही समोर आली असून गेल्या पाच वर्षांत येथील २७४८ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यापैकी २०५१ जणांचा शोध लागला असला तरी अद्यापही ६५२ जण बेपत्ता आहेत. अचानक बेपत्ता होणारे हे नागरिक कुठे आहेत. त्यांचे काय झाले. याबाबत पोलीस प्रशासनाकडेही कुठलीही माहिती नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

शिर्डी येथून वर्षभरात ९० भाविक बेपत्ता झाल्याचे प्रकरण उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतले आहे. नांदेड येथेही अशाच पद्धतीने बेपत्ता होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठे असल्याचे पोलीस आकडेवारी सांगते. जिल्ह्यातील २०११ ते आॅक्टोबर २०१९ या कालावधीतील बेपत्ता प्रकरणांची माहिती घेतली असता,  आतापर्यंत २७४८ जण बेपत्ता झाल्याचे पुढे आले. यामध्ये १४२८ पुरुष तर १३२० महिलांचा समावेश आहे. या बेपत्ता नागरिकांपैकी १०६० पुरुष व ९५१ महिला अशा एकूण २०५१ जणांचा कालांतराने शोध लागला. मात्र यातील ६५२ जण गेले कुठे याची माहिती ना त्यांच्या कुटुंबियांना आहे ना पोलीस यंत्रणेला. नागरिक बेपत्ता होण्याची कारणे विविध असली तरी अलीकडील काळात ही संख्या वाढत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. 

मनोरुग्णांचे प्रमाण जास्तनागरिकांचे बेपत्ता होण्यामागे विविध कारणे असली तरी, यात सर्वाधिक संख्या ही मानसिक संतुलन बिघडलेल्या नागरिकांची आहे. याबरोबरच वैवाहिक जीवनातील भांडण तंट्यामुळेही अनेक जण घर सोडून जात असल्याचे पोलीस तपासावरून दिसते. चालू वर्षाची आकडेवारी पाहिली असता मागील १० महिन्यांत ६२२ जण बेपत्ता झाले असून यामध्ये निम्म्याहून अधिक म्हणजे ३४६ महिलांचा समावेश आहे. च्या कालावधीत बेपत्ता झालेल्या ६२२ पैकी ९८ पुरुष व १४२ महिलांचा शोध लागला असला तरी अद्यापही १७८ पुरुष व १६८ महिला  बेपत्ता आहेत. मानसोपचार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कौटुंबिक कलह, क्षणिक रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या व्यक्तीला पुन्हा घराकडे परतावेसे वाटते. मात्र  टीकाटिप्पणीच्या भीतीपोटी ते परत येण्याचे टाळतात.

घरातून निघून जाण्याची कारणे पाहिली असता प्रामुख्याने कौटुंबिक कलहातून विकोपाला गेलेली भांडणे, व्यसनामुळे बिघडलेली मानसिक स्थिती, तीव्र उदासीनता, व्यक्तिमत्त्व दोष आदी तत्सम कारणे आढळतात. आक्रमक वृत्ती, उतावीळपणा याबरोबरच परिणामांचा अंदाज घेण्याची क्षमता हरवून निर्णय घेण्याची वृत्ती नाहीशी होणे आदी कारणे आढळतात. बेपत्ता होणाऱ्या अनेकांना मानसिक आजारही जडलेला असू शकतो. मात्र तरीही या सर्व बाबी टाळण्यासाठी कौटुंबिक सकारात्मक संवाद हा एकमेव पर्याय आहे. - डॉ. रामेश्वर बोले, मानसोपचारतज्ज्ञ, नांदेड

टॅग्स :Missingबेपत्ता होणंPoliceपोलिसNandedनांदेड