शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

नांदेडमधील बेपत्ता झालेले ६५२ जण गेले कुठे ? आकडेवारी चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:58 IST

शिर्डी येथून वर्षभरात ९० भाविक बेपत्ता झाल्याचे प्रकरण उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतले आहे.

ठळक मुद्दे  आतापर्यंत २७४८ जण बेपत्ता झाल्याचे पुढे आले. यामध्ये १४२८ पुरुष तर १३२० महिलांचा समावेश आहे.

नांदेड : राज्यामध्ये शिर्डी येथील बेपत्ता नागरिकांचे प्रकरण नुकतेच ऐरणीवर आले आहे. यानंतर नांदेड जिल्ह्यातील आकडेवारीही समोर आली असून गेल्या पाच वर्षांत येथील २७४८ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यापैकी २०५१ जणांचा शोध लागला असला तरी अद्यापही ६५२ जण बेपत्ता आहेत. अचानक बेपत्ता होणारे हे नागरिक कुठे आहेत. त्यांचे काय झाले. याबाबत पोलीस प्रशासनाकडेही कुठलीही माहिती नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

शिर्डी येथून वर्षभरात ९० भाविक बेपत्ता झाल्याचे प्रकरण उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतले आहे. नांदेड येथेही अशाच पद्धतीने बेपत्ता होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठे असल्याचे पोलीस आकडेवारी सांगते. जिल्ह्यातील २०११ ते आॅक्टोबर २०१९ या कालावधीतील बेपत्ता प्रकरणांची माहिती घेतली असता,  आतापर्यंत २७४८ जण बेपत्ता झाल्याचे पुढे आले. यामध्ये १४२८ पुरुष तर १३२० महिलांचा समावेश आहे. या बेपत्ता नागरिकांपैकी १०६० पुरुष व ९५१ महिला अशा एकूण २०५१ जणांचा कालांतराने शोध लागला. मात्र यातील ६५२ जण गेले कुठे याची माहिती ना त्यांच्या कुटुंबियांना आहे ना पोलीस यंत्रणेला. नागरिक बेपत्ता होण्याची कारणे विविध असली तरी अलीकडील काळात ही संख्या वाढत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. 

मनोरुग्णांचे प्रमाण जास्तनागरिकांचे बेपत्ता होण्यामागे विविध कारणे असली तरी, यात सर्वाधिक संख्या ही मानसिक संतुलन बिघडलेल्या नागरिकांची आहे. याबरोबरच वैवाहिक जीवनातील भांडण तंट्यामुळेही अनेक जण घर सोडून जात असल्याचे पोलीस तपासावरून दिसते. चालू वर्षाची आकडेवारी पाहिली असता मागील १० महिन्यांत ६२२ जण बेपत्ता झाले असून यामध्ये निम्म्याहून अधिक म्हणजे ३४६ महिलांचा समावेश आहे. च्या कालावधीत बेपत्ता झालेल्या ६२२ पैकी ९८ पुरुष व १४२ महिलांचा शोध लागला असला तरी अद्यापही १७८ पुरुष व १६८ महिला  बेपत्ता आहेत. मानसोपचार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कौटुंबिक कलह, क्षणिक रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या व्यक्तीला पुन्हा घराकडे परतावेसे वाटते. मात्र  टीकाटिप्पणीच्या भीतीपोटी ते परत येण्याचे टाळतात.

घरातून निघून जाण्याची कारणे पाहिली असता प्रामुख्याने कौटुंबिक कलहातून विकोपाला गेलेली भांडणे, व्यसनामुळे बिघडलेली मानसिक स्थिती, तीव्र उदासीनता, व्यक्तिमत्त्व दोष आदी तत्सम कारणे आढळतात. आक्रमक वृत्ती, उतावीळपणा याबरोबरच परिणामांचा अंदाज घेण्याची क्षमता हरवून निर्णय घेण्याची वृत्ती नाहीशी होणे आदी कारणे आढळतात. बेपत्ता होणाऱ्या अनेकांना मानसिक आजारही जडलेला असू शकतो. मात्र तरीही या सर्व बाबी टाळण्यासाठी कौटुंबिक सकारात्मक संवाद हा एकमेव पर्याय आहे. - डॉ. रामेश्वर बोले, मानसोपचारतज्ज्ञ, नांदेड

टॅग्स :Missingबेपत्ता होणंPoliceपोलिसNandedनांदेड