शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

अर्णब गोस्वामींची दिवाळी कुठे? निर्णय अलिबाग सत्र न्यायालयाच्या हातात

By पूनम अपराज | Updated: November 9, 2020 18:00 IST

Arnab Goswami :जामीन अर्जावर चार दिवसांत निकाल देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले तर दुसरीकडे अर्णब यांच्यावतीनं सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल आला आहे. 

ठळक मुद्देनियमित जामिनाचा पर्याय असला तरी थेट मुंबई हायकोर्टात जाऊन जामीन मिळवता येऊ शकतो, असा चुकीचा पायंडा पडणार नाही का?’ असा सवाल न्या. शिंदे यांनी केला होता. 

मुंबई - अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटकेविरोधात गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली असून आज मुंबई  हायकोर्टाने अर्णब यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. त्यांना सत्र न्यायालयात जाण्याचे हायकोर्टाने सुचवले आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून अर्णब यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे अर्णब गोस्वामींची यंदाची दिवाळी तळोजा कारागृहात की घरी?, याचा फैसला आता अलिबागसत्र न्यायालय करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर अर्णब यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय येण्याआधी काही वेळ आधीच अलिबाग सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. अर्णब यांच्या जामीन अर्जावर चार दिवसांत निकाल देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले तर दुसरीकडे अर्णब यांच्यावतीनं सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल आला आहे. अन्यव नाईक आत्महत्या प्रकरणातील रायगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणीचे कामकाज आज पार पडले असून गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर उदया सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसेच पुनर्निरीक्षण अर्जावर देखील कामकाज होणार आहे. 

 

Breaking - Arnab Goswami : अर्णब गोस्वामींचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला; आता मदार सेशन्स कोर्टावर

 

तपास अधिकाऱ्याने न्यायदंडाधिकारी कोर्टाला अवगत करून पुन्हा तपास सुरू केला, हे कोणत्याही प्रकारे बेकायदा म्हटले जाऊ शकत नाही. आरोपीला जसे मूलभूत हक्क असतात, तसेच पीडितालाही असतात असे निरीक्षण उच्च न्यायालयाने आजच्या निकालात नमूद केले आहे. तसेच अलिबाग न्यायदंडाधिकारी कोर्टाने प्रकरण बंद करण्यापूर्वी फिर्यादी नाईक कुटुंबाला नोटीस दिली नाही. त्याचप्रमाणे संरक्षण याचिका दाखल करण्याची संधीही दिली नाही. म्हणूनच फिर्यादी अक्षता नाईक यांनी तपासासाठी वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असे देखील उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

 

Arnab Goswami : अबू सालेमवर जेथे हल्ला झाला, तेथे तळोजा कारागृहात अर्णब यांना केलीय कैद

 

अन्वय नाईक व कुमुद नाईक आत्महत्या प्रकरणात या दोघांना आत्महत्यांसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णव गोस्वामी, नितीश सारडा आणि फिरोज शेख हे तिघे ४ नोव्हेंबरपासून आहेत अटकेत. मात्र आज मुंबई हायकोर्टाने अर्णब आणि फिरोज या दोघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. दरम्यान अर्णब यांनी जामिनासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यामुळे अर्णब यांनी यंदाची दिवाळी जेलमध्ये की घरी याचा सर्वस्व निर्णय सत्र न्यायालयाच्या हातात आहे. तसेच महत्वाचे म्हणजे शनिवारी सुनावणीदरम्यान आम्ही अशी विनंती मान्य करून अंतरिम सुटकेचा आदेश केला तर कायदेशीर प्रक्रियेने कनिष्ठ न्यायालयांना असलेले महत्त्व कमी केल्यासारखे होईल. शिवाय नियमित जामिनाचा पर्याय असला तरी थेट मुंबई हायकोर्टात जाऊन जामीन मिळवता येऊ शकतो, असा चुकीचा पायंडा पडणार नाही का?’ असा सवाल न्या. शिंदे यांनी केला होता. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीSessions Courtसत्र न्यायालयalibaugअलिबागHigh Courtउच्च न्यायालयjailतुरुंगDiwaliदिवाळी