शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

चार मुली असताना वंशाचा दिवा हवा, म्हणून चार वर्षांच्या मुलाचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 08:39 IST

कल्याण रेल्वे स्थानकातील घटना, रेल्वेतून नाशिकला जात असताना आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण रेल्वेस्थानकावरील वेटिंग रूममधून सकाळी चार वर्षांच्या मुलाचे एकाने अपहरण केले. याप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तपास सुरू करून अवघ्या आठ तासांत मुलाचा शोध लावला आणि त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अपहरणकर्ता कचरू वाघमारे याला अटक केली. धक्कादायक म्हणजे कचरू वाघमारे याला चार मुली आहेत. वंशाचा दिवा आणि मुलाच्या हव्यासापोटी त्याने मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायकबाब तपासात समोर आली.

कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील करण गुप्ता आणि त्याची पत्नी शुभांगी गुप्ता हे दोघे मजुरीचे काम करतात. त्यांना चार वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी अशी दोन मुले आहेत. आज सकाळी कपडे धुण्यासाठी करण आणि शुभांगी कल्याण रेल्वेस्थानकावरील वेटिंग रूममध्ये आले. मात्र, साबण नसल्याने आपल्या दोन्ही मुलांना बाहेर  खेळायला सोडून ते जोडपे साबण आणण्यासाठी स्थानकाबाहेर गेले. यावेळी त्यांच्या मुलांसोबत आणखी चार मुली त्या ठिकाणी खेळत होत्या. त्याठिकाणी एक जोडपे होते. त्यांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगून करण आपल्या पत्नीसह साबण आणण्यासाठी गेला. साबण घेऊन परतल्यानंतर त्यांना धक्काच बसला. अथर्व व त्यांच्यासोबत खेळत असलेल्या चारही मुली तिथे नव्हत्या.

करणने आजुबाजुला आपल्या मुलाचा शोध घेतला. मात्र, मुलगा आढळून आला नाही. त्याने कल्याण रेल्वे गुन्हे पोलिस ठाणे गाठले. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तत्काळ या मुलाचा शोध सुरू केला. स्थानक परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मुलाच्या शोधासाठी पथके नेमली. सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास  एक जण अथर्वला घेऊन कल्याण रेल्वे स्थानक फलाटावरून जात असल्याचे आढळून आले. ही व्यक्ती नाशिकला जाणारी ट्रेन पकडण्याच्या घाईत होती. रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने या व्यक्तीवर झडप घालत त्याला ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून  मुलाची सुटका केली. 

चौकशीदरम्यान त्याचे नाव कचरू वाघमारे असल्याचे उघड झाले. कचरू वाघमारे याला चार मुली आहेत. त्याला मुलगा हवा होता. मुलाच्या हव्यासापोटी त्याने चार वर्षांच्या अथर्वचे अपहरण केल्याचीबाब समोर आली. पोलिसांनी कचरूला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.