शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

Arnab Goswami: सुनावणीवेळी अर्णब गोस्वामीला कोर्टात हजर केलं तेव्हा नेमकं काय घडलं? न्यायधीशांनी खडसावलं

By प्रविण मरगळे | Updated: November 5, 2020 10:20 IST

Arnab Goswami, Anvay Naik Suicide Case, Alibaug Court News: अर्णब यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला. तेव्हा न्यायधीशांनी अर्णबची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देपोलिसांनी कोर्टाची परवानगी न मागता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु केलीसबळ पुरावा नसताना अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींची पोलीस कोठडी का पाहिजे हे कोर्टाला सांगता आलं नाहीजवळपास ८-९ तास कोर्टात ही सुनावणी सुरु होती. न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली

मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी रायगड पोलिसांनी अटक केली, मुंबईतील वरळी येथील राहत्या घरातून अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेतलं, तिथून रायगड पोलिसांनी दुपारी १ च्या सुमारास अर्णब गोस्वामी यांना अलिबागच्या कोर्टात हजर केले. अर्णबला १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र रात्री उशीरापर्यंत अर्णब प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरु होती

अर्णब यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला. तेव्हा न्यायधीशांनी अर्णबची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अर्णब गोस्वामी न्यायलयात हातवारे, इशारे करताना दिसल्यावर न्यायधीश संतापले, त्यांनी अर्णब गोस्वामी यांना तुम्ही नीट उभे राहा, हातवारे करू नका असं बजावलं, त्यानंतर अर्णब शांत बसून सुनावणी ऐकू लागले. अर्णबला मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी नाकारला. त्यानंतर रिमांड अर्जावर सुनावणीवेळी कोर्टाने ३ निरीक्षणे नोंदवली.

पोलिसांनी कोर्टाची परवानगी न मागता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु केली, कोणताही सबळ पुरावा नसताना अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींची पोलीस कोठडी का पाहिजे हे कोर्टाला सांगता आलं नाही, तर अन्वय नाईक,आई कुमुद यांचा मृत्यू आणि आरोपींचा काय संबंध याबद्दल रायगड पोलीस न्यायालयाला समजून सांगू शकले नाहीत, पुरावेही देऊ शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी केलेली अटक अवैध असल्याचं सांगत न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. याबाबत बीबीसीनं वृत्त दिलं आहे. जवळपास ८-९ तास कोर्टात ही सुनावणी सुरु होती. न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सुनावणीनंतर अर्णब गोस्वामी यांच्याकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला परंतु त्यावर सुनावणी कधी होईल याबाबत कोर्टाने अद्याप स्पष्ट सांगितले नाही. मात्र अर्णब गोस्वामी यांच्या वकिलांनी या प्रकरणात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. दुपारी ३ वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

भाजपचे नेते आक्रमक

अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्धची कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, रवी शंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी इत्यादींनीही कारवाईचा निषेध केला.

काँग्रेसचे प्रत्युत्तर

अर्णब यांच्या अटकेवरून भाजपचा आक्रोश एकतर्फी असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले. अर्णब यांनी पत्रकारितेला बदनाम केले आणि भाजपने अशी एकतर्फी भूमिका घेतल्याने आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी दिली.

अटकेनंतर केली दीड तास चौकशी

अलिबाग येथील अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केल्यानंतर पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर बुधवारी, ४ नोव्हेंबरला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पत्रकार अर्णब गोस्वामींना अटक केली. मुंबईतील राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर, त्यांना चौकशीसाठी अलिबागला आणण्यात आले. सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलीस अलिबागमध्ये पोहोचले. पोलीस ठाण्यासमोर पोलीस गाडीतून उतरल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी पत्रकारांकडे बघून विजयाची खूण दाखवली.

घटनाक्रम : अटक प्रकरण

- सकाळी ७ वाजता : मुंबई आणि रायगड पोलीस अर्णब यांच्या वरळी येथील घरी धडकले.

- सकाळी ८:१५  वाजता : अर्णब गोस्वामी मुंबई आणि रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले.

- सकाळी  ११.३० : पोलीस बंदोबस्तामध्ये अर्णब यांना अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

- दुपारी १२.१४ : अलिबाग पोलीस ठाण्यातच आरोग्य तपासणी करण्यात आली.

- दुपारी १ : अर्णब न्यायालयात हजर, मारहाण केल्याचा आरोप.

- सायंकाळी ५ : पुन्हा आरोग्य चाचणी करत न्यायालयात हजर करण्यात आले

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीCourtन्यायालयPoliceपोलिसAnvay Naikअन्वय नाईक