शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आसाम-मिझोराम बॉर्डरवर हिंसाचार; मुख्यमंत्र्यांनी PMO ला केले सतर्क

By हेमंत बावकर | Updated: October 19, 2020 09:43 IST

Assam-Mizoram border issue: मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सीमा वाद सोडविण्याची आणि सीमेवर शांतता व कायदा सुव्यवस्था कायम करण्याची मागणी केली आहे. 

आसाम-मिझोरामच्या बॉर्डरवर शनिवार- रविवार रात्रीच्या सुमारास हिंसाचार उफाळून आला. यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी रविवारी रात्री दोन्ही राज्यांच्या सीमेवरील परिस्थिती पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयाला कळविली आहे. तसेच मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांच्याशी चर्चाही केली आहे. 

पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना आसामच्या कछार जिल्हा आणि मिझोरामच्या कोलासिब जिल्ह्यातील सीमावर्ती भागात तैनात करण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सीमा वाद सोडविण्याची आणि सीमेवर शांतता व कायदा सुव्यवस्था कायम करण्याची मागणी केली आहे. 

सोनोवाल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा भाग वेगाने विकास करत आहे. या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. तसेच त्यांच्यातील संबंध चांगले व्हायला हवेत. सोनोवाल यांनी सांगितले की, मतभेद असू शकतात परंतू सर्व मतभेदांमध्ये चर्चा करूनच तोडगा काढला पाहिजे. 

मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी आंतरराज्य सीमेवर शांतता कायम ठेवणे आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कछार जिल्ह्यातील लायलपूर भागात शनिवारी सायंकाळी आसाम आणि मिझोराम राज्यांच्या दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये अनेक लोक जखमी झाले. लैलापूर भागात या गटांनी अनेक घरांना आग लावली. दुसरीकडे आसामचे वनमंत्री परिमल सुखावैद्य यांनी रविवारी लायलपूर भागाचा दौरा केला. तसेच शांतता राखण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानAssamआसाम