शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आसाम-मिझोराम बॉर्डरवर हिंसाचार; मुख्यमंत्र्यांनी PMO ला केले सतर्क

By हेमंत बावकर | Updated: October 19, 2020 09:43 IST

Assam-Mizoram border issue: मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सीमा वाद सोडविण्याची आणि सीमेवर शांतता व कायदा सुव्यवस्था कायम करण्याची मागणी केली आहे. 

आसाम-मिझोरामच्या बॉर्डरवर शनिवार- रविवार रात्रीच्या सुमारास हिंसाचार उफाळून आला. यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी रविवारी रात्री दोन्ही राज्यांच्या सीमेवरील परिस्थिती पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयाला कळविली आहे. तसेच मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांच्याशी चर्चाही केली आहे. 

पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना आसामच्या कछार जिल्हा आणि मिझोरामच्या कोलासिब जिल्ह्यातील सीमावर्ती भागात तैनात करण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सीमा वाद सोडविण्याची आणि सीमेवर शांतता व कायदा सुव्यवस्था कायम करण्याची मागणी केली आहे. 

सोनोवाल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा भाग वेगाने विकास करत आहे. या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. तसेच त्यांच्यातील संबंध चांगले व्हायला हवेत. सोनोवाल यांनी सांगितले की, मतभेद असू शकतात परंतू सर्व मतभेदांमध्ये चर्चा करूनच तोडगा काढला पाहिजे. 

मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी आंतरराज्य सीमेवर शांतता कायम ठेवणे आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कछार जिल्ह्यातील लायलपूर भागात शनिवारी सायंकाळी आसाम आणि मिझोराम राज्यांच्या दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये अनेक लोक जखमी झाले. लैलापूर भागात या गटांनी अनेक घरांना आग लावली. दुसरीकडे आसामचे वनमंत्री परिमल सुखावैद्य यांनी रविवारी लायलपूर भागाचा दौरा केला. तसेच शांतता राखण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानAssamआसाम