शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

पोलिसांच्या डायरीत हेराफेरी अन् बरंच काही; पंचनामा सूर्यप्रकाशात, मात्र...

By मनीषा म्हात्रे | Updated: April 24, 2025 09:17 IST

माहिती अधिकारानंतर कागदपत्रांमध्ये छेडछाड करत काही कागदपत्रे त्यात घुसविण्यात आल्याचे दिसून येत आहे.

मनीषा म्हात्रेमुंबई - विक्रोळीत दाखल केेलेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात सहायक पोलिस आयुक्तांना तपासाचे अधिकार असताना उपनिरीक्षकाच्या हाती तपासाची धुरा दिली. प्रकरण अंगलट येताना दिसताच कागदपत्रांमध्येच छेडछाड केल्याची धक्कादायक माहिती अधिकारातून मागवलेल्या कागदपत्रांतून समोर येत आहे.  पंचनाम्यानुसार, स्वच्छ सूर्यप्रकाशात पंचनामा झाल्याचे नमूद आहे. तर स्टेशन डायरीनुसार एसीपी मात्र संध्याकाळी घटनास्थळी रवाना झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे उपनिरीक्षकाने केलेल्या पंचनाम्यावरच तारखेत खाडाखोड केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. 

आधीच तपासात होत असलेल्या दिरंगाईमुळे त्रस्त असताना या कागदपत्रांवरून तपासाला गांभीर्याने घेतले जात नसल्याचा आरोप तक्रारदार करत आहेत. अशाप्रकारे वरिष्ठ अधिकारीच करायला लागले तर? आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? असा सवालही उपस्थित होत आहे. विक्रोळीतील गणेश घाडगे यांच्यावर गेल्यावर्षी २७ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वा. अफजल निसार शेख ऊर्फ पाया याच्या टोळीने हल्ला करत जातिवाचक शिवीगाळ केली. टागोरनगर भागात सुरू असलेला कामावर प्रत्येक गाडीमागे १८०० रुपये देण्यास नकार दिला म्हणून हा हल्ला करण्यात आला होता. 

या प्रकरणात पायासह साकीर शेख, सलीम कुरेशीला अटक केली. तर अन्य साथीदार मोकाट आहेत. पोलिसांच्या तपासाबाबत त्याचे वकील अश्विन भागवत यांनी मागवलेल्या कागदपत्रांत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

तपास केला गेल्या वर्षी, आदेश मात्र या वर्षी माहिती अधिकारानंतर कागदपत्रांमध्ये छेडछाड करत काही कागदपत्रे त्यात घुसविण्यात आल्याचे दिसून येत आहे. २८  डिसेंबर रोजी एसीपींनी पोलिस उपनिरीक्षक योगेश चिंचोले यांना तब्येत ठीक नसल्याने पोलिस ठाण्यास पोहोचण्यास उशीर होईल. त्यामुळे गुन्ह्याचा प्राथमिक तपास करण्याचे आदेश दिले. मात्र, प्रत्यक्षात ही प्रत २०२५ मध्ये गेल्याचे दिसून येत आहे. या कागदपत्रांवरून तपासावर संशय व्यक्त होत चौकशी करावी, अशी मागणीही भागवत यांनी केली आहे.

...अन् आरोपी झाला गायबहाती लागलेल्या सीसीटीव्हीत घटनेच्या दिवशी घाडगे यांनी ओळखलेल्या आरोपींपैकी गुड्डू अन्सारी, रिझवानही पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. मात्र, दोघेही पोलिसांच्या निगराणीत बाहेर पडताना दिसत आहे. आम्ही ओळख करून दिलेल्या आरोपींना पोलिसांनी का सोडले? याचीही चौकशीची मागणी करण्यात येत आहे. याबाबत पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांच्याकडे विचारणा करताच त्यांनी याबाबत अधिक माहिती घेण्यात येईल असे सांगितले.

आधी कॉल, नंतर हल्ला? आरोपींच्या कॉल लॉगनुसार, अटक आरोपी सलीम कुरेशीने ११ वा. १८ मिनिटांनी विक्रोळी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाला कॉल केल्याचे दिसून येत आहे. त्याच्या १२ मिनिटांत साडेअकरा वाजता घाडगेवर हल्ला होताना दिसत आहे. त्यामुळे हा हल्ला पोलिसांना अलर्ट देऊनच करण्यात आला का? याचीही चौकशी करण्याची मागणी करत, तक्रारदाराने पोलिस आयुक्तांसह पोलिस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे. तसेच काही पाहिजे आरोपी पोलिसांसोबत मोकाट फिरत असून जीवाला धोका असल्याचीही भीतीही घाडगेने वर्तविली आहे.

रात्रीच्या अंधारात सूर्यप्रकाश कुठून आलाभागवत यांच्या म्हणण्यानुसार, ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्तांनी करणे अपेक्षित असताना त्या घटनास्थळी आल्या नाहीत. २८ तारखेला सकाळी उपनिरीक्षक योगेश चिंचोले यांनी पंचनामा केला. त्यात पंचनामा कधी सुरू केला आणि कधी संपला, याची नोंद नाही. तारखेत खाडाखोड करत तो ३० तारखेला झालेला दाखवला. त्यावरील एसीपी प्राची कर्णे यांची सही देखील खोटी असल्याचा संशय आहे. डायरीतील नोंदीनुसार, २९ डिसेंबर रोजी एसीपी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी रवाना झाल्या आणि अर्ध्या तासात परतल्याची नोंद आहे. तिथे कोणी गेलेच नव्हते. घटनास्थळावरील सीसीटीव्हीही पुरावे आहेत. 

३० तारखेला सायंकाळी साडेसात वाजता एसीपी या उपनिरीक्षक कोळी सोबत घटनास्थळी पंचनामा झाल्याची नोंद आहे. पंचनाम्यानुसार, सूर्यप्रकाशात पंचनामा करण्यात आला आहे. तर, नोंदीनुसार एसीपी सायंकाळी साडेसात वा. पंचनाम्याला रवाना झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात सूर्यप्रकाश कुठून आला? याचाही तपास होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी