शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

वज्रेश्वरी हादरलं! दाम्पत्याची गळा चिरून हत्या; कारण अस्पष्ट, वाद मालमत्तेचा? संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 05:28 IST

भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरीजवळील पेंढारीपाडा येथील वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या केल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरीजवळील पेंढारीपाडा येथील वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. जगन्नाथ (बाळू) पाटील (वय ८३), सत्यभामा पाटील (वय ७५), अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी वज्रेश्वरी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

वज्रेश्वरीजवळ अंबाडी रस्त्यालगत असलेल्या आपल्या घरात दोघेच शेती करून राहत होते. त्यांची घराजवळ तीस एकरहून अधिक शेती आहे. त्यात त्यांनी एक तलावही बांधला आहे. शनिवारी सकाळी दाेघेही बराच वेळ बाहेर न आल्यामुळे एका मुलाने खिडकीतून डाेकावून पाहिले असता रक्ताच्या थाराेळ्यात दाेघांचे मृतदेह दिसून आले. त्यानंतर पाेलिसांना कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान घराजवळच घुटमळला. गर्दी असल्याने त्याला माग काढता आला नाही, असे पाेलिसांनी सांगितले. 

महिलेच्या अंगावर दागिने आणि घरातील वस्तू चाेरीला गेल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या दाम्पत्याला दोन मुले असून, ते बाहेरगावी वास्तव्यास आहेत. जमिनीवरून काही नातेवाइकांशी त्यांचा वाद सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई-वडोदरा या महामार्गात त्यांची जागा गेली होती. काही महिन्यांपूर्वी त्याचा घसघशीत माेबदला त्यांना मिळाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यामुळे पाेलिसांनी ही हत्या मालमत्तेच्या वादातून झाली की, चाेरीच्या उद्देशाने, अशा दाेन्ही बाजूंनी तपास सुरू केला आहे.

संशयित ताब्यात

पाेलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याची चाैकशी सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखा, ठाणे यांच्यामार्फत तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी