शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हत्येची तारीख बदलल्याने वाचला काकाचा जीव; पुतण्याने रचला होता हत्येचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 16:50 IST

पोलिसांनी डाव उधळून केले सहा आरोपींना जेरबंद

ठळक मुद्देपोलिसांनी वेगवेगळ्या कलामांअन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.नालासोपाऱ्यातील बेकरीमध्ये काम करणाऱ्या फिरोज शराफत अन्सारी याला काकाच्या हत्येची २ लाख रुपयांची सुपारी देऊन 10 हजार रुपये ऍडव्हान्स दिले.

नालासोपारा - काकाची हत्या करण्यासाठी सुपारी देणाऱ्या पुतण्यासह सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने जेरबंद करत हत्येचा डाव उधळून लावल्याची घटना घडली आहे. हत्येची तारीख बदलल्यामुळेच व्यापारी काकाचा जीव वाचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या कलामांअन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, एका व्यापाऱ्याच्या हत्येसाठी सुपारी देण्यात आली असून त्याची लवकर हत्या केली जाणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर वसई युनिटच्या टीमने वेगवेगळ्या ठिकाणांहून 6 जणांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यावर ही धक्कादायक व खरी माहिती उजेडात आली. नालासोपारा शहरात राहणारे रोशनलाल गुप्ता हे व्यापारी असून परिसरातील बेकऱ्या आणि अनेक दुकानांना होलसेल भावात तेल आणि मैदा पोहचवण्याचा व्यवसाय करत होते. त्यांचा पुतण्या मिथिलेश गुप्ता उर्फ मॉन्टी याचा सुद्धा हाच व्यवसाय असून तो याच परिसरात करत होता. काका आणि पुतण्या या दोघांमध्ये याच व्यवसायावरून वाद असल्याने भांडणे होत होती. काही महिन्यांपासून पुतण्या मिथिलेश हा आजारी असल्याने तो एका मांत्रिकाकडे गेला होता. त्या मांत्रिकाने सांगितले की, तुझ्या काकाने तुझ्यावर जादूटोणा आणि करणी केली आहे. ही गोष्ट माहिती मिळाल्यावर नाराज झालेल्या पुतण्याने काकाची हत्या करण्याचा डाव आखून हत्येची सुपारी देण्याचा विचार केला होता. त्याने नालासोपाऱ्यातील बेकरीमध्ये काम करणाऱ्या फिरोज शराफत अन्सारी याला काकाच्या हत्येची २ लाख रुपयांची सुपारी देऊन 10 हजार रुपये ऍडव्हान्स दिले. अन्सारीने हत्येसाठी मोहम्मद परवेज अन्सारी, अजय बिडलान, रिजवान जमाल खान आणि मंगलू गुप्ता त चार मित्रांना तयार केले. काकाला दाखवण्यासाठी पुतण्या या पाचही आरोपींना १ सप्टेंबरला नालासोपारा पूर्वेकडील विजयनगर येथे घेऊन गेला होता. त्या सर्वांना लांबूनच काकाला दाखवून हत्येसाठी तारीख आणि वेळ पुतण्याने ठरवली पण काहींना काही अडचण येत असल्याने अनेक वेळा हत्येच्या तारखा आणि वेळ बदली झाल्याने हत्या करण्यात आरोपींना यश आले नाही. यातच पोलिसांना माहिती मिळाल्यावर हत्येचा डाव उधळून 6 आरोपींना अटक करत व्यापारी काकाचा जीव पोलिसांनी वाचवला आहे.

 

व्यवसायातील वादामुळे आणि तांत्रिकाने करणी केल्याचे सांगितल्याने पुतण्याने काकाचा काटा काढण्याचा डाव आखून २ लाख रुपयांची ५ आरोपींना सुपारी दिली होती. हत्येचा डाव उधळून लावत ६ आरोपींना अटक केली आहे. त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - जितेंद्र वनकोटी (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर)

टॅग्स :ArrestअटकMurderखूनPoliceपोलिसVasai Virarवसई विरारbusinessव्यवसाय