शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

हत्येची तारीख बदलल्याने वाचला काकाचा जीव; पुतण्याने रचला होता हत्येचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 16:50 IST

पोलिसांनी डाव उधळून केले सहा आरोपींना जेरबंद

ठळक मुद्देपोलिसांनी वेगवेगळ्या कलामांअन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.नालासोपाऱ्यातील बेकरीमध्ये काम करणाऱ्या फिरोज शराफत अन्सारी याला काकाच्या हत्येची २ लाख रुपयांची सुपारी देऊन 10 हजार रुपये ऍडव्हान्स दिले.

नालासोपारा - काकाची हत्या करण्यासाठी सुपारी देणाऱ्या पुतण्यासह सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने जेरबंद करत हत्येचा डाव उधळून लावल्याची घटना घडली आहे. हत्येची तारीख बदलल्यामुळेच व्यापारी काकाचा जीव वाचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या कलामांअन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, एका व्यापाऱ्याच्या हत्येसाठी सुपारी देण्यात आली असून त्याची लवकर हत्या केली जाणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर वसई युनिटच्या टीमने वेगवेगळ्या ठिकाणांहून 6 जणांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यावर ही धक्कादायक व खरी माहिती उजेडात आली. नालासोपारा शहरात राहणारे रोशनलाल गुप्ता हे व्यापारी असून परिसरातील बेकऱ्या आणि अनेक दुकानांना होलसेल भावात तेल आणि मैदा पोहचवण्याचा व्यवसाय करत होते. त्यांचा पुतण्या मिथिलेश गुप्ता उर्फ मॉन्टी याचा सुद्धा हाच व्यवसाय असून तो याच परिसरात करत होता. काका आणि पुतण्या या दोघांमध्ये याच व्यवसायावरून वाद असल्याने भांडणे होत होती. काही महिन्यांपासून पुतण्या मिथिलेश हा आजारी असल्याने तो एका मांत्रिकाकडे गेला होता. त्या मांत्रिकाने सांगितले की, तुझ्या काकाने तुझ्यावर जादूटोणा आणि करणी केली आहे. ही गोष्ट माहिती मिळाल्यावर नाराज झालेल्या पुतण्याने काकाची हत्या करण्याचा डाव आखून हत्येची सुपारी देण्याचा विचार केला होता. त्याने नालासोपाऱ्यातील बेकरीमध्ये काम करणाऱ्या फिरोज शराफत अन्सारी याला काकाच्या हत्येची २ लाख रुपयांची सुपारी देऊन 10 हजार रुपये ऍडव्हान्स दिले. अन्सारीने हत्येसाठी मोहम्मद परवेज अन्सारी, अजय बिडलान, रिजवान जमाल खान आणि मंगलू गुप्ता त चार मित्रांना तयार केले. काकाला दाखवण्यासाठी पुतण्या या पाचही आरोपींना १ सप्टेंबरला नालासोपारा पूर्वेकडील विजयनगर येथे घेऊन गेला होता. त्या सर्वांना लांबूनच काकाला दाखवून हत्येसाठी तारीख आणि वेळ पुतण्याने ठरवली पण काहींना काही अडचण येत असल्याने अनेक वेळा हत्येच्या तारखा आणि वेळ बदली झाल्याने हत्या करण्यात आरोपींना यश आले नाही. यातच पोलिसांना माहिती मिळाल्यावर हत्येचा डाव उधळून 6 आरोपींना अटक करत व्यापारी काकाचा जीव पोलिसांनी वाचवला आहे.

 

व्यवसायातील वादामुळे आणि तांत्रिकाने करणी केल्याचे सांगितल्याने पुतण्याने काकाचा काटा काढण्याचा डाव आखून २ लाख रुपयांची ५ आरोपींना सुपारी दिली होती. हत्येचा डाव उधळून लावत ६ आरोपींना अटक केली आहे. त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - जितेंद्र वनकोटी (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर)

टॅग्स :ArrestअटकMurderखूनPoliceपोलिसVasai Virarवसई विरारbusinessव्यवसाय