शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

गडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण; दोघांवर मिळून ६ लाखांचे होते बक्षीस

By मनोज ताजने | Updated: September 21, 2022 14:22 IST

विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाचे यश

गडचिरोली : नक्षल्यांकडून बुधवार दि.२८ पासून पाळल्या जात असलेल्या विलय दिन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर दोन नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केले. त्यातील अनिल उर्फ रामसाय जगदेव कुजूर (२६ वर्ष) याच्यावर ४ लाखांचे तर रोशनी उर्फ ईरपे नरंगो पल्लो (३० वर्ष) हिच्यावर २ लाखांचे ईनाम शासनाने ठेवले होते. हे दोघेही सध्या आपापल्या घरी राहून नक्षल चळवळीसाठी काम करत होते.

अनिल हा एटापल्ली तालुक्यातील रा. तिम्मा जवेली येथील रहिवासी असून रोशनी ही छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील डांडीमरका या गावातील रहिवासी आहे. नक्षल चळवळीपासून दूर जाऊन शांततेने जीवन जगण्यासाठी त्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. चळवळीत महिलांना दुय्यम वागणुकीसह अनेक बाबतीत डावलले जाते. वरिष्ठ माओवाद्यांकडून महिलांना लग्नासाठी बळजबरी केली जाते, अशा अनेक कारणांमुळे आपण आत्मसमर्पण करीत असल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता या दोघांनाही केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

दलममधील सहभाग आणि गुन्हे    अनिल कुजूर : डिसेंबर २००९ मध्ये कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन मे २०१० पर्यंत तिथे कार्यरत होता. मे २०१० ते २०१२ पर्यंत कसनसूर दलममध्ये कार्यरत होता. त्यानंतर २०१२ ते २०२२ या दरम्यान घरी राहूनच नक्षल दलमने सांगितलेले कामे करत होता. यादरम्यान तो २०११ मधील खोब्रामेंढा ॲम्बुशमध्ये सहभागी होता. त्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद तर ५ जवान जखमी झाले होते. तसेच निहायकल ते ग्यारापत्ती रोडवरील ॲम्बुशमध्ये सीआरपीएफचे ५ जवान जखमी झाले होते. २०११ मधील छोटा झेलिया जंगलातील चकमकीतही तो सहभागी होता.

रोशनी पल्लो : सन २००९ मध्ये छत्तीसगडमधील जटपूर दलममध्ये ती सदस्य पदावर भरती झाली. काही दिवसातच तिला झोन टेक्निकल दलममध्ये पाठविण्यात आले. २०१५ ते २०१८ पर्यंत एसीएम व उपकमांडर पदावरही ती कार्यरत होती. त्यानंतर जुलै २०१८ पासून ती घरी राहून दलमचे काम करत होती. तिचा सन २०१५ मध्ये मौजा कुंदला (छ.ग.) जंगल परिसरातील चकमक, मौजा गुंडूरपारा (छ.ग.) जंगल परिसरातील चकमक आणि २०१७ मध्ये मौजा दुरवडा (छ.ग.) येथील गोटूलमध्ये व जंगल परिसरात झालेल्या दोन चकमकींमध्ये सहभाग होता. २०१५ मध्ये भामरागड तालुक्यातील मौजा इरपनार गावातील ३ लोकांच्या खुनाचा तिच्यावर आरोप आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली