शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नागपुरात साडेतीन तासात दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 22:46 IST

यशोधरा नगरातील गुंडाच्या हत्या प्रकरणाच्या वृत्ताची शाई ताजीच असताना प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दोन हत्येच्या वेगवेगळ्या घटना घडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यशोधरा नगरातील गुंडाच्या हत्या प्रकरणाच्या वृत्ताची शाई ताजीच असताना प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दोन हत्येच्या वेगवेगळ्या घटना घडल्या.

प्रतापनगरात दुपारी एका तरुणाची दोघांनी भीषण हत्या केली. तर हुडकेश्वरमध्ये सायंकाळी दुसऱ्या एका तरुणाची हत्या झाली. अवघ्या साडेतीन तासातील या दोन हत्येच्या घटनेमुळे सर्वत्र थरार निर्माण झाला आहे.कार्तिक लक्ष्मण साळवे (वय २४, रा. गोपाल नगर) असे प्रतापनगरात हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या प्रेयसीच्या भावाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने त्याची निर्घृण हत्या केली. कार्तिक साळवे हा एका स्थानिक वाहिनीमध्ये कॉम्प्युटर आॅपरेटर म्हणून काम करीत होता. त्याचे प्रताप नगरातील युवतीसोबत प्रेमसंबंध होते. ते उघड झाल्यामुळे तिचा भाऊ आरोपी विक्की नेपाळी याच्यासोबत यापूर्वी त्याचे भांडणही झाले होते. नेपाळीने कार्तिकला तिच्यापासून दूर राहण्याचे सांगून गंभीर परिणामाचा इशारा दिला होता. मात्र कार्तिकच्या प्रेम प्रकरणात अंतर आले नाही. त्याच्या प्रेयसीसोबत भेटीगाठी सुरूच असल्याचे ध्यानात आल्यामुळे नेपाळी संतापला होता. त्याने कार्तिक साळवेचा गेम करण्याचा कट रचला.गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास कार्तिक दुचाकीने गोपाल नगरातून जात असताना दोन आरोपी एका दुचाकीवर बसून आले. मागे बसलेला आरोपी नेपाळीच्या हातात लोखंडी रॉड होता. धावत्या गाडीवरून त्याने कार्तिकच्या डोक्यावर जोरदार फटका हाणला. त्यामुळे कार्तिक दुचाकीवरून खाली पडला. त्यानंतर आरोपीने त्याच्या डोक्यावर पुन्हा रॉडचे अनेक फटके मारले. त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी पळून गेले. वर्दळीच्या भागात ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. माहिती कळताच प्रतापनगरचे ठाणेदार भीमराव खंदाडे, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ आपल्या ताफ्यासह तेथे पोहचले. गुन्हे शाखेचे पथकही पोहचले. आजूबाजूच्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपींची शोधाशोध सुरू केली. रात्री ८ च्या सुमारास पोलिसांनी आरोपी नेपाळी ऊर्फ विक्रम हुकुम बहादुर कार्की (वय २७, रा. दाते ले-आउट, एमआयडीसी) आणि रामू भीमबहादुर गोदामे (वय २९, रा. प्रसाद नगर, जयताळा, एमआयडीसी) या दोघांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर आरोपींना विचारपूस तसेच अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.या घटनेची चर्चा सुरू असतानाच सायंकाळी ६ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडोळे सभागृहाच्या बाजूला वैभव मुरते (वय ३०) या तरुणाची पाच ते सात गुंडांनी भीषण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतवैभव तवेरा चालवायचा. त्याचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असून राजीव गांधी योजनेंतर्गतही तो काम करायचा. गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास तो पडोळे सभागृहाजवळून जात असताना त्याच्या डोळ्यात गुंडाच्या एका टोळक्याने मिरची पावडर झोकले. वैभव हतबल झाल्यानंतर त्याच्यावर घातक शस्त्राचे अनेक घाव घालून गुंडांनी त्याची हत्या केली आणि पळून गेले. भररस्त्यावर झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच हुडकेश्वरचे ठाणेदार राजकमल वाघमारे, पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांनी धाव घेतली. गुन्हे शाखेचे पथकही पोहचले. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची नावे आणि या हत्येच्या घटनेचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे ठाणेदार वाघमारे यांनी सांगितले.यशोधरानगरात आरोपी गजाआडयशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात गुंड अनुज ऊर्फ अनू ठाकूर सुदाम बघेल (वय २४) याची कुख्यात उस्मान अली, त्याचा भाऊ मेहबूब अली आणि कलिम ऊर्फ मखन अन्सारी या तिघांनी यशोधरानगरातील फुकटनगरात बुधवारी रात्री १०च्या सुमारास निर्घृण हत्या केली होती. या हत्येचा तपास करून पोलिसांनी उपरोक्त तिघांना गुरुवारी अटक केली.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर