शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

उल्हासनगरात दोघा भावांचे अपहरण करून एकाची केली हत्या, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 20:40 IST

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देउल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथील चायनीज हॉटेलमध्ये भरत व राजू थापा असे दोन भाऊ काम करीत होते. विठ्ठलवाडी पोलिसांनी खून, अपहरण आदी गुन्ह्याची नोंद करून गुन्हेगारी टोळक्याचा शोध घेत आहेत.

उल्हासनगर : चिंचपाडा येथील चायनीज हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोघा भावांचे मोटारसायकल चोरीच्या संशयावरून रविवारी रात्री १ वाजता मारहाण करून कारमध्ये अपहरण केले. एका भावाला नांदिवली गावा जवळ उतरून दिले असून दुसऱ्या भावाचा मृत्युदर दुसऱ्या दिवशी हातपाय बांधलेल्या अवस्थेत मिळाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथील चायनीज हॉटेलमध्ये भरत व राजू थापा असे दोन भाऊ काम करीत होते. २७ सप्टेंबरच्या रात्री १ वाजता १० ते १२ जणाच्या टोळक्याने मोटारसायकल चोरल्याचा संशयावरून दोघे भावना जबरी मारहाण केली. तसेच कारमध्ये जबरदस्तीने टाकून घेवून गेले. नांदिवली गावाजवळ रस्त्याच्या बाजूला राजू थापा याला कार मधून उतरून दिले. तर भरत याला कार मध्ये घेवून गेले. दुसऱ्या दिवसी भरत याचा मृतदेह नेवाळी - मंगरूळ रस्त्यावर मिळून आला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून राजू थापा यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी १० ते १२ जनाच्या टोळक्यावर अपहरण, खुनाचा गुन्हा दाखल केला.शहारा शेजारील हाजी मलंग परिसरात चोरी, हाणामारी, खून आदी घटनेत वाढ झाली असून पोलिस गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली. विठ्ठलवाडी पोलिसांनी खून, अपहरण आदी गुन्ह्याची नोंद करून गुन्हेगारी टोळक्याचा शोध घेत आहेत.

 

 

टॅग्स :KidnappingअपहरणMurderखूनPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगरArrestअटक