शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संतापजनक! ...अन् काही मिनिटांत 16 वर्षांचं नातं तुटलं; गरम पाणी दिल्याने पतीने दिला तलाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 11:23 IST

Triple Talaq : पत्नीने गरम पाणी दिलं म्हणून पतीने तिला ट्रिपल तलाक दिल्याची संतापजनक घटना आता समोर आली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये गरम पाण्यावरून भांडण झालं आणि पुढे ते भांडण टोकाला गेलं. या भांडणातूनच संतापलेल्या पतीने अवघ्या काही मिनिटांत तब्बल 16 वर्षांचं नातं संपवलं आहे. पत्नीने गरम पाणी दिलं म्हणून पतीने तिला ट्रिपल तलाक दिल्याची संतापजनक घटना आता समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या जोडप्याच्या निकाहाला 16 वर्षे झाली असून त्यांना पाच मुलं आहेत. 

देशामध्ये ट्रिपल तलाकच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. पीडितेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. जहांगीराबाद पोलीस ठाणे परिसरातील सदरुद्दीन गावात ही भयंकर घटना घडली. एका छोट्याशा कारणावरून पतीने टोकाचा निर्णय घेतला आणि पत्नीला ट्रिपल तलाक दिला. यानंतर महिलेने आपल्या भावासोबत पोलीस ठाण्यात जाऊन तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि पतीवर नाते तोडल्याचा आरोप केला आहे. 

गरम पाण्यावरून भांडण झालं

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, निकाहानंतर सासरच्या मंडळींनी खूप छळ केला. मानसिक आणि शारीरीक त्रास दिला. आपल्याला पाच मुलं असून सर्वात लहान मुलगा हा दोन वर्षांचा आहे. गुरुवारी औषध घेताना पतीला गरम पाणी दिलं म्हणून ते नाराज झाले. रागाच्या भरात त्याने मला घराबाहेर काढलं आणि तीन वेळा तलाक म्हणून ट्रिपल तलाक दिला. त्यानंतर घरामध्ये असलेल्या सर्व मुलांना मारहाण केली. 

ट्रिपल तलाक देऊन पतीने 16 वर्षांचं नातंच संपवलं

एसओ दर्शन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने पतीवर ट्रिपल तलाक दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच आपली मुलं लहान असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी कोणीच नसल्याचं देखील महिलेने म्हटलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकUttar Pradeshउत्तर प्रदेश