शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! ...अन् काही मिनिटांत 16 वर्षांचं नातं तुटलं; गरम पाणी दिल्याने पतीने दिला तलाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 11:23 IST

Triple Talaq : पत्नीने गरम पाणी दिलं म्हणून पतीने तिला ट्रिपल तलाक दिल्याची संतापजनक घटना आता समोर आली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये गरम पाण्यावरून भांडण झालं आणि पुढे ते भांडण टोकाला गेलं. या भांडणातूनच संतापलेल्या पतीने अवघ्या काही मिनिटांत तब्बल 16 वर्षांचं नातं संपवलं आहे. पत्नीने गरम पाणी दिलं म्हणून पतीने तिला ट्रिपल तलाक दिल्याची संतापजनक घटना आता समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या जोडप्याच्या निकाहाला 16 वर्षे झाली असून त्यांना पाच मुलं आहेत. 

देशामध्ये ट्रिपल तलाकच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. पीडितेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. जहांगीराबाद पोलीस ठाणे परिसरातील सदरुद्दीन गावात ही भयंकर घटना घडली. एका छोट्याशा कारणावरून पतीने टोकाचा निर्णय घेतला आणि पत्नीला ट्रिपल तलाक दिला. यानंतर महिलेने आपल्या भावासोबत पोलीस ठाण्यात जाऊन तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि पतीवर नाते तोडल्याचा आरोप केला आहे. 

गरम पाण्यावरून भांडण झालं

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, निकाहानंतर सासरच्या मंडळींनी खूप छळ केला. मानसिक आणि शारीरीक त्रास दिला. आपल्याला पाच मुलं असून सर्वात लहान मुलगा हा दोन वर्षांचा आहे. गुरुवारी औषध घेताना पतीला गरम पाणी दिलं म्हणून ते नाराज झाले. रागाच्या भरात त्याने मला घराबाहेर काढलं आणि तीन वेळा तलाक म्हणून ट्रिपल तलाक दिला. त्यानंतर घरामध्ये असलेल्या सर्व मुलांना मारहाण केली. 

ट्रिपल तलाक देऊन पतीने 16 वर्षांचं नातंच संपवलं

एसओ दर्शन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने पतीवर ट्रिपल तलाक दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच आपली मुलं लहान असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी कोणीच नसल्याचं देखील महिलेने म्हटलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकUttar Pradeshउत्तर प्रदेश