शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रिक्षातून प्रवास करणे ठरतेय धोक्याचे, रिक्षाचालकानेच प्रवाशाला निर्जनस्थळी नेऊन लुटले

By प्रशांत माने | Updated: August 30, 2022 22:49 IST

याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

डोंबिवली - रिक्षातून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. बाजुला बसलेल्या सहप्रवाशाकडून लुटण्याच्या घटना आधी घडल्या असताना एका रिक्षाचालकाने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने प्रवाशाला निर्जन स्थळी नेऊन त्याच्याकडील २५ हजाराचा मोबाईल आणि डेबीट कार्ड लंपास केल्याची घटना पुर्वेकडील खंबाळपाडा परिसरात सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

टाटा पॉवर, पिसवली येथे राहणाऱ्या अभिषेक विश्वकर्मा यांनी सोमवारी पहाटे घरी येण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानका बाहेरुन रिक्षा पकडली. त्यावेळी रिक्षात बसलेल्या चालकाने आणि रिक्षाच्या मागील सीटवर बसलेल्या दोघांनी खंबाळपाडा येथे एक प्रवाशी घेतो आणि पिसवली येथे सोडतो असे सांगितले. रिक्षाचालकाने रिक्षा मंजुनाथ कॉलेज, खंबाळपाडा येथील मागील बाजूस नेऊन एका नवीन बिल्डींगच्या बांधकामाच्या ठिकाणी विश्वकर्मा यांना नेले आणि त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने विश्वकर्मा यांच्या खिशातील मोबाईल आणि डेबीट कार्ड अशा वस्तू काढून तिघांनी रिक्षातून पळ काढला. या घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याआधीही अशा घटना घडल्याने रिक्षाचा प्रवास सुरक्षित राहीला नसल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून स्पष्ट झाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीPoliceपोलिस