शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

...अन् गावित भगिनींनी ६ चिमुकल्यांची निर्घृण हत्या केली; अंगावर काटा आणणारी थरारक भयकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 06:18 IST

दोघींच्या फाशीच्या शिक्षेत कपात करून जन्मठेपेची शिक्षा

मुंबई : सीमा गावित व रेणुका शिंदे या दोन बहिणींना २००१ मध्ये सहा चिमुकल्यांची क्रूर हत्या आणि १३ बालकांचे अपहरण केल्याप्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने २००४ मध्ये शिक्कामोर्तब केले. मात्र, त्यांच्या दया अर्जावर निर्णयास विलंबामुळे उच्च न्यायालयाने मंगळवारी या दोघींच्या फाशीच्या शिक्षेत कपात करून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.या निमित्ताने या दोघींच्या राक्षसी कृत्याची सुरुवात कशी झाली? याचा हा आढावा...अभद्र त्रिकुटाची उत्पत्ती सीमा व रेणुका यांची आई अंजनाबाई ही मुलींसाठी ‘आदर्श आई’ ठरू शकली नाही. खिसा कापणे, किरकोळ चोऱ्या, याखेरीज अंजनाबाईकडे अन्य काही जीवन कौशल्य नव्हते. १९८० च्या काळात तिच्यावर १२५ हून अधिक चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले. अंजनाच्या या सवयीला कंटाळून पती मोहन गावित याने तिला सोडले. अस्वस्थ झालेल्या अंजनाबाईने याचा बदला घ्यायचे ठरविले. मोहनने दुसरा विवाह केला व त्याला एक मुलगीही झाली. दुसऱ्या विवाहापासून झालेल्या मुलीचे अपहरण करून हत्या करण्याचा कट शिजला. या कटात अंजनाबाई आणि तिच्या दोन मुली सीमा, रेणुका यांचा समावेश होता. सुरुवातीला केवळ सूड उगवायचा होता. मात्र, नंतर सूडाच्या भावनेचे लोभात रुपांतर झाले. त्यातूनच त्यांनी चिमुकल्यांच्या अपहरणाची व हत्येची मालिका सुरू केली. कोल्हापुरातून सुरुवात  १९९५ मध्ये या तिघींनी कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकातून भीक मागणाऱ्या महिलेचे ‘राजा’ हे मूल चोरले. पाठाेपाठ तेथूनच दीड वर्षाचा ‘संतोष’, श्री अंबाबाई मंदिरातून श्रद्धा ऊर्फ भाग्यश्री पाटील या बालकांचे अपहरण करून त्यांचा चोरी, पाकीटमारीसाठी वापर केला व नंतर त्यांची क्रूरपणे हत्या केल्याचे उघड झाले.  असा लागला सुगावा    मोहन गावितची दुसरी मुलगी क्रांती हिचे अपहरण त्यांना भोवले. अंजनानेच आपल्या मुलीचे अपहरण केले असावे, याबाबत मोहन आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीला खात्री होती. पोलिसांनाही त्याची खात्री झाली आणि त्यातूनच पुणे, कोल्हापूर आणि नाशिक येथे झालेल्या लहान मुलांच्या अपहरणाचा आणि हत्येचा पर्दाफाश झाला. ४३ बालकांचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. मात्र, १३ मुलांचे अपहरण व सहा मुलांची क्रूर हत्या केल्याचेच पुरावे पोलिसांना मिळाले होते. अखेर भरला पापाचा घडा १९९६ पर्यंत या तिघी सतत आपला ठावठिकाणा बदलत होत्या. पोलिसांनी रेणुकाचा नवरा किरण शिंदे याला अटक केली. त्याला पोलिसांनी ‘माफीचा साक्षीदार’ केले. या दोघींच्या घरात हरविलेल्या मुलांचे कपडे सापडले. अनेक अनोळखी लहान मुलांचे फोटोही हाती आले. अखेरीस सीमाने क्रांतीचे (मोहन गावितची मुलगी) अपहरण आणि हत्येबद्दल माहिती दिली. हे सर्व आईच्या आदेशावरून केल्याचे सीमाने पोलिसांना सांगितले. अटकेनंतर जेमतेम एक वर्षात अंजनाबाईचा कारागृहातच नैसर्गिक मृत्यू झाला. त्यानंतर दोन बहिणींवर खटला चालला. कोल्हापूर सत्र न्यायालयाने रेणुका व सीमा या दोघी बहिणींना २८ जून २००१ रोजी फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर २००४ मध्ये मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने या दोघींच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले.राष्ट्रपतींकडे आरोपींचा दयेचा अर्ज तब्बल ७ वर्षे प्रलंबित राहिला, त्यामुळे गावीत बहिणींना त्याचा फायदा होऊन फाशी शिक्षेचा निर्णय आजन्म कारावासात झाला. भारतीय घटनेनुसार राष्ट्रपतींकडे दिलेल्या दयेच्या अर्जाचा निकाल किती दिवसात द्यावा, यासाठी कालमर्यादा नाही. पण आता कालमर्यादेची गरज आहे. यापूर्वीही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज प्रलंबित राहिल्यामुळे अनेक फाशीच्या शिक्षेच्या निकालाचे जन्मठेपेत परिवर्तन झाले आहे.     - उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील