शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

गांधी जयंतीनिमित्त आर्थर रोड कारागृहातील 3 कैद्यांची करण्यात आली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 23:11 IST

आर्थररोड प्रमाणेच राज्यभरातील तुरुंगांमध्ये गांधीजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई - महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीचे औचित्य साधत आर्थर रोड तुरुंगातून आज तीन कैद्यांची सुटका करण्यात आली. राज्यभरातील तुरुंगात असलेल्या १०० कैद्याची शिक्षा माफ करण्यात आली आहे. यात आर्थर रोड तुरुंगातील १४ कैद्यांचा समावेश असून या सर्व कैद्यांना टप्याटप्याने सोडण्यात येणार आहे. 

गांधी जयंतीनिमित्त मुंबई सर्वोदय मंडळातर्फे आज एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गांधीजींच्या जीवन व कार्याबद्दल व्याख्यान देण्यात आले. मंडळाचे कार्यकर्ते प्रेमशंकर तिवारी व कमलेश गांधी यांनी दीडशे  कैद्यांना मार्गदर्शन केले. तसेच मंडळातर्फे शिक्षा माफ होणाऱ्या कैद्यांना गांधीजींची आत्मकथा, ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक भेट देण्यात आले. आजच्या परिस्थितीत गांधी विचारांना पर्याय नसून, गांधी विचार अधिकाधिक कैद्यापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आर्थर रोड कारागृहाचे अधिक्षक हर्षद अहिरराव यांनी केले.  यावेळी तुरुंगातून सुटका होणाऱ्या तीनही कैद्यांनी सुटकेनंतर गांधीजींच्या सत्य व अहिंसेच्या मार्गावर चालणार असल्याचे निवेदन केले. आर्थररोड प्रमाणेच राज्यभरातील तुरुंगांमध्ये गांधीजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPrisonतुरुंग