शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

सायबर गुन्ह्यांच्या हजारो तक्रारी; केवळ १५०० गुन्हे दाखल; कोरोनामुळे तपास थंडावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 06:33 IST

ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ

- विवेक भुसे पुणे : सायबर गुन्ह्यांबाबतच्या तक्रारीत तिपटीने वाढ होत असताना राज्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मात्र त्या मानाने कमी आहे़ गेल्या ५ महिन्यांत १ हजार ५१८ गुन्हे दाखल झाले असून, केवळ ८८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे़ सायबर गुन्हे करणाऱ्या टोळ्या या प्रामुख्याने परराज्यांतील असल्याने लॉकडाऊनच्या काळात प्रवासावरील बंधनांमुळे हा तपास जवळपास थंडावला आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये काही हजारांपर्यंत सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल आहेत़ मात्र, या सर्व तक्रारींचा तपास करण्यासाठी पोलिसांकडे आवश्यक तेवढे बळ उपलब्ध नाही़ दुसरीकडे यातील सायबर चोरटे हे प्रामुख्याने नोएडा, दिल्ली, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान या राज्यांतील असल्याने तेथे जाऊन त्यांच्या शोध घेऊन आरोपींना पकडणे हे अतिशय अवघड काम झाले आहे.

राज्यात सायबर गुन्हेगारीमध्ये डेबिड कार्ड, क्रेडिट कार्डचा गोपनीय क्रमांक विचारून फसवणूक केल्याचे दिसून येत आहे़ याशिवाय फसवणुकीचे वेगवेगळे  फंडे वापरून सायबर चोरटे नागरिकांना ऑनलाईन लुबाडताना दिसत आहेत़ गेल्या वर्षी २०१९ मध्ये राज्यात ४ हजार ६२२ सायबर गुन्हे दाखल झाले होते, तर २०१८ मध्ये ३ हजार ५११ गुन्हे दाखल झाले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ४ महिन्यांत सायबर चोरट्यांनी नागरिकांची फसवणूक केलेल्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे़ मात्र, त्याचा प्राथमिक तपास केल्यानंतर या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले जातात़ कोरोनामुळे पोलिसांकडून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमीझाले आहे़ गेल्या ५ महिन्यांत राज्यात १ हजार ५१८ गुन्हे दाखल झाले आहेत़ त्यापैकी सर्वाधिक गुन्हे हे जानेवारीमध्ये ४२० दाखल झाले होते़ त्यापैकी ३५ गुन्हे उघड होऊन ४७ आरोपींना अटक करण्यात आली होती़ त्यानंतर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होत गेले आहे.

ऑनलाइन फसवणूक

ऑनलाईन फसवणुकीत प्रामुख्याने डेबिट/क्रेडिट कार्ड क्लोनिंग, ऑनलाईनखरेदी करून फसवणूक, ओटीपी शेअर करायला लावून फसवणूक, हनीट्रॅप,सोशल मीडियावर बदनामी, वाहन खरेदीत फसवणूक, फेसबुक हॅकिंग, जॉब फ्रॉड,गिफ्ट फ्रॉड, अशा प्रकारे गुन्ह्यांचे स्वरूप आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम