शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

‘ते’ चार वादग्रस्त अधिकारी पुन्हा सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 10:33 IST

चार अधिकाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारकडून क्लीन चिट दिल्याचे समोर आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या चार अधिकाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारकडून क्लीन चिट दिल्याचे समोर आले आहे. या चारही अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेत असल्याबाबतचे शासन आदेश गुरुवारी जारी करण्यात आले. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक पराग मणेरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांचा समावेश आहे.  

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या कथित खंडणी प्रकरणात पराग मणेरे यांचे नाव समोर आले  होते. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तर राजेंद्र पाल यांच्यावर परभणी जिल्ह्यात असताना एका तरुणाला गुन्ह्यात न अडकविण्यासाठी दोन कोटींची मागणी करणे आणि त्यातील १० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीने अटक केली होती. त्या वेळी पाल हे सेलू उपविभागीय कार्यालयाचे उपअधीक्षक पदावर कार्यरत होते. तर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन गैरवर्तन करणे, स्वतःच्या वाहनावर लाल दिवा लावून फिरणे महत्त्वाच्या बंदोबस्तावेळी मुख्यालयाची परवानगी न घेता बाहेर फिरणे याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 

६५ अधिकारी गुन्हे शाखेत... पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई गुन्हे शाखेतील ५ वर्षांहून अधिक कार्यकाळ काम केलेल्या ६५ अधिकाऱ्यांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. त्या अधिकाऱ्यांना पुन्हा गुन्हे शाखेत घेण्याची लगबगही मुंबई पोलीस दलात पाहावयास मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिले हाेते नाराजीचे पत्र   सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी विभागाची जबाबदारी असताना एसीबीने ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. त्यानंतर, त्यांनाही सेवेतून निलंबित केले होते. निलंबनापूर्वी हिंगोली येथे बदली न मिळाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र लिहिल्यामुळे देखील चर्चेत आल्या होत्या.  एसीबीच्या कारवाईनंतरही कारवाई चुकीची असल्याचा दावा करत त्यांचा व्हायरल व्हिडीओही चर्चेत आला होता. 

टॅग्स :Policeपोलिस