शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

‘ते’ चार वादग्रस्त अधिकारी पुन्हा सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 10:33 IST

चार अधिकाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारकडून क्लीन चिट दिल्याचे समोर आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या चार अधिकाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारकडून क्लीन चिट दिल्याचे समोर आले आहे. या चारही अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेत असल्याबाबतचे शासन आदेश गुरुवारी जारी करण्यात आले. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक पराग मणेरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांचा समावेश आहे.  

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या कथित खंडणी प्रकरणात पराग मणेरे यांचे नाव समोर आले  होते. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तर राजेंद्र पाल यांच्यावर परभणी जिल्ह्यात असताना एका तरुणाला गुन्ह्यात न अडकविण्यासाठी दोन कोटींची मागणी करणे आणि त्यातील १० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीने अटक केली होती. त्या वेळी पाल हे सेलू उपविभागीय कार्यालयाचे उपअधीक्षक पदावर कार्यरत होते. तर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन गैरवर्तन करणे, स्वतःच्या वाहनावर लाल दिवा लावून फिरणे महत्त्वाच्या बंदोबस्तावेळी मुख्यालयाची परवानगी न घेता बाहेर फिरणे याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 

६५ अधिकारी गुन्हे शाखेत... पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई गुन्हे शाखेतील ५ वर्षांहून अधिक कार्यकाळ काम केलेल्या ६५ अधिकाऱ्यांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. त्या अधिकाऱ्यांना पुन्हा गुन्हे शाखेत घेण्याची लगबगही मुंबई पोलीस दलात पाहावयास मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिले हाेते नाराजीचे पत्र   सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी विभागाची जबाबदारी असताना एसीबीने ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. त्यानंतर, त्यांनाही सेवेतून निलंबित केले होते. निलंबनापूर्वी हिंगोली येथे बदली न मिळाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र लिहिल्यामुळे देखील चर्चेत आल्या होत्या.  एसीबीच्या कारवाईनंतरही कारवाई चुकीची असल्याचा दावा करत त्यांचा व्हायरल व्हिडीओही चर्चेत आला होता. 

टॅग्स :Policeपोलिस