शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

कमी वयात लग्नाचे प्रमाण आणखी वाढणार; कोरोना, युद्ध, वातावरणातील बदलामुळे भीती वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:19 IST

युनिसेफचा अहवाल तयार करणाऱ्या टीमच्या प्रमुख क्लॉडिया कॅपा म्हणाल्या की, अशा विवाहांमध्ये बहुतांश मुलींचे वय १२ ते १७ वयोगटातील असते.

न्यूयॉर्क : जगात बालविवाह होण्याचे प्रमाण कमी होत असले, तरीही याचे प्रमाण इतके आहे की, बालविवाह पूर्णपणे संपण्यासाठी तब्बल ३०० वर्षे लागतील, असे समोर आले आहे.

युनिसेफचा अहवाल तयार करणाऱ्या टीमच्या प्रमुख क्लॉडिया कॅपा म्हणाल्या की, अशा विवाहांमध्ये बहुतांश मुलींचे वय १२ ते १७ वयोगटातील असते. कोरोना महामारी, युद्धे आणि वातावरणातील बदल यामुळे लवकर लग्नाचा धोका वाढत आहे. २०३०  पर्यंत कमी वयातील एक कोटींहून अधिक मुलींची लग्ने होण्याची भीती आहे.

६४कोटी  महिलांचे लग्न लहान वयातसध्या जगात ६४ कोटी स्त्रिया आहेत ज्यांचे लग्न वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधी झाले आहे. दरवर्षी सुमारे १.२ कोटी मुलींचे लग्न १८ वर्षांआधी केले जाते. असे असले तरी गेल्या २५ वर्षांत बालविवाहांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे.

लग्न म्हणजे  पोटाची सोय?बालविवाहामुळे  असमानतेची समस्या वाढते. अनेक कुटुंब याकडे मुलीच्या संरक्षणाचा मार्ग म्हणून पाहतात.अनेक कुटुंबांसाठी मुलीच्या लग्नाचा अर्थ म्हणजे त्यांच्या घरातील एका सदस्याच्या पोटाची सोय त्यांना करावी लागत नाही.

दक्षिण आशिया हे बालविवाहाचे सर्वात मोठे केंद्र आहे. 

बालविवाहाविरोधात भारतात मोहीम सुरू असली, तरीही जगातील ६४ कोटी बालवधूंपैकी एक तृतीयांश बालवधू या भारतात आहेत. युनिसेफ विशेषतः आफ्रिकेच्या सब-सहारा प्रदेशाबद्दल चिंतित आहे, जेथे बालविवाह होण्याचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही.