शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कमी वयात लग्नाचे प्रमाण आणखी वाढणार; कोरोना, युद्ध, वातावरणातील बदलामुळे भीती वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:19 IST

युनिसेफचा अहवाल तयार करणाऱ्या टीमच्या प्रमुख क्लॉडिया कॅपा म्हणाल्या की, अशा विवाहांमध्ये बहुतांश मुलींचे वय १२ ते १७ वयोगटातील असते.

न्यूयॉर्क : जगात बालविवाह होण्याचे प्रमाण कमी होत असले, तरीही याचे प्रमाण इतके आहे की, बालविवाह पूर्णपणे संपण्यासाठी तब्बल ३०० वर्षे लागतील, असे समोर आले आहे.

युनिसेफचा अहवाल तयार करणाऱ्या टीमच्या प्रमुख क्लॉडिया कॅपा म्हणाल्या की, अशा विवाहांमध्ये बहुतांश मुलींचे वय १२ ते १७ वयोगटातील असते. कोरोना महामारी, युद्धे आणि वातावरणातील बदल यामुळे लवकर लग्नाचा धोका वाढत आहे. २०३०  पर्यंत कमी वयातील एक कोटींहून अधिक मुलींची लग्ने होण्याची भीती आहे.

६४कोटी  महिलांचे लग्न लहान वयातसध्या जगात ६४ कोटी स्त्रिया आहेत ज्यांचे लग्न वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधी झाले आहे. दरवर्षी सुमारे १.२ कोटी मुलींचे लग्न १८ वर्षांआधी केले जाते. असे असले तरी गेल्या २५ वर्षांत बालविवाहांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे.

लग्न म्हणजे  पोटाची सोय?बालविवाहामुळे  असमानतेची समस्या वाढते. अनेक कुटुंब याकडे मुलीच्या संरक्षणाचा मार्ग म्हणून पाहतात.अनेक कुटुंबांसाठी मुलीच्या लग्नाचा अर्थ म्हणजे त्यांच्या घरातील एका सदस्याच्या पोटाची सोय त्यांना करावी लागत नाही.

दक्षिण आशिया हे बालविवाहाचे सर्वात मोठे केंद्र आहे. 

बालविवाहाविरोधात भारतात मोहीम सुरू असली, तरीही जगातील ६४ कोटी बालवधूंपैकी एक तृतीयांश बालवधू या भारतात आहेत. युनिसेफ विशेषतः आफ्रिकेच्या सब-सहारा प्रदेशाबद्दल चिंतित आहे, जेथे बालविवाह होण्याचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही.