शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

४ मुलांच्या आईनं दोघांवर जीव लावला; लग्नाच्या १० दिवसापूर्वी एकाला संपवला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 19:04 IST

बिटोलाची पती दिल्लीत दगड कापण्याचे काम करतो. अर्जुन त्याच्याकडे नोकरी करायचा. बिटोलाचे गावातील मुन्नासोबत संबंध होते. याचवेळी बिटोला अर्जुनच्याही प्रेमात पडली

बांदा - उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात प्रेम प्रकरणात एका महिलेने कथित प्रियकरासोबत मिळून दुसऱ्या प्रियकराची कुऱ्हाडीनं हत्या केली आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. घटनास्थळी कुऱ्हाड आणि मृतकाचा मोबाईल सापडला आहे. या घटनेतील महिला ही ४ मुलांची आई असून तिला २ मुले आणि २ मुली आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार, दुर्गापूर येथील अर्जुन उर्फ छोटे हा घरापासून १०० मीटर अंतरावरील एका गोठ्यात रविवारी झोपण्यासाठी गेला होता. सोमवारी सकाळी मोठा भाऊ जनावरांना चारा देण्यासाठी गोठ्यात पोहचला तेव्हा अर्जुन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आले. त्याच्या गळ्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले होते. स्थानिकांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. 

मोठ्या भावाने सांगितले की, रात्री अर्जुनला फोन आला होता. गावातील बिटोला यादव आणि मुन्ना पांडे दरवाजा उघडण्यासाठी सांगत होते. मी दरवाजा उघडू नको असं सांगत त्यांना सकाळी भेटा असा निरोप द्यायला सांगितला. परंतु अर्जुननं ऐकलं नाही. तो घराबाहेर पडला. मुन्ना आणि बिटोला यांनी मिळून अर्जुनची हत्या केलीय असा आरोप करत भावाने मुन्ना पांडेय आणि बिटोला यादव यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला. 

बिटोलाची पती दिल्लीत दगड कापण्याचे काम करतो. अर्जुन त्याच्याकडे नोकरी करायचा. बिटोलाचे गावातील मुन्नासोबत संबंध होते. याचवेळी बिटोला अर्जुनच्याही प्रेमात पडली. तो कधीही गावात यायचा तेव्हा बिटोलाला भेटायला जायचा. मुन्नाला या दोघांच्या प्रेम प्रकरणाची माहिती पडली. तेव्हा त्याने बिटोलाला सोबत घेऊन अर्जुनचा काटा काढण्याचा ठरवले. त्या दोघांनी मिळून अर्जुनची हत्या केली. प्रथम दर्शनी हे हत्याचे प्रकरण वाटत असून पोलीस तपास करत आहेत अशी माहिती एएसपीने दिली. 

दिल्लीहून १५ दिवसांसाठी आला, २० तारखेला होतं लग्न अर्जुन दिल्लीला काम करायचा. १५ दिवसांपूर्वी तो दिल्लीहून आला होता. त्याचे २० फेब्रुवारीला लग्न होते. घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र लग्नाच्या आधीच अर्जुनच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ज्या घरातून वरात निघणार होते तिथेच अर्जुनची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली. अर्जुन नेहमी लाला यादवकडून बिटोलासाठी पाठवलेले सामान दिल्लीहून घेऊन यायचा. त्यामुळे बिटोलासोबत अर्जुनची जवळीक वाढली. याचाच बदला घेण्यासाठी बिटोला प्रियकर मुन्ना पांडेयने महिलेसोबत मिळून अर्जुनची कुऱ्हाडीने हत्या केली.