शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

...म्हणून पत्नी आणि दोन चिमुकल्यांना विष देऊन व्यापाऱ्याने संपविले आयुष्य; शिवाजी नगर हत्या आत्महत्येचा उलगडा

By मनीषा म्हात्रे | Updated: October 3, 2022 19:48 IST

शिवाजी नगर हत्या आत्महत्येचा उलगडा

मुंबई : डोक्यावर दीड लाखाचे कर्ज. त्यात बहिणीच्या लग्नासाठी पैसे नसल्याच्या नैराश्यात पत्नी आणि दोन मुलांना विष देऊनशकील जलील खान (३४)  या व्यापाऱ्याने गळफास घेत आयुष्य संपविल्याचा धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी दोन महिन्याने शिवाजी नगर पोलिसांनी मृत खान विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

शिवाजी नगरच्या रोड क्रमांक १४ येथील इंदिरानगर झोपडपट्टीत खान कुटुंबीय राहण्यास होते. शकील जलील खान (३४)  यांचा पान, सुपारी विक्रीचा व्यवसाय होता. पत्नी रजिया (२५), मुलगा सरफराज (७) आणि मुलगी अतिसा (३) असे त्यांचे हसते खेळते कुटुंब होते. २९ जुलै रोजी खान यांचा भाऊ रात्री जेवण उरकून घराबाहेर पडला. सकाळी घरी परतला तेव्हा, आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने त्यांना संशय आला.

जलील फोनही घेत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करताच, जलील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तर, रजिया यांच्या एका बाजूला सरफराज तर दुसऱ्या बाजूला कुशीत अतिसा बेशुद्धावस्थेत दिसून आली. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी, तात्काळ सर्वाना जवळच्या सरकारी रग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले आले.

शिवाजी नगर पोलिसांनी केलेल्या तपासात खान याच्यावर दीड लाखाचे कर्ज होते. तसेच त्याला बहिणीच्या लग्नाचा खर्च स्वतः उचलायचा होता. मात्र त्यासाठीही पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे तो नैराश्येत होता. याच तणावातून त्याने पत्नी आणि मुलांना शीतपेयातून विष देत स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, खान विरोधात रविवारी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हत्येचा गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस