शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 19:17 IST

मध्यवर्ती, विठ्ठलवाडी व हिललाईन पोलिसांनी गेल्या ३ दिवसात तब्बल ९ बांगलादेशी नागरिकांना अटक करून गुन्हा दाखल केला.

उल्हासनगर : मध्यवर्ती, विठ्ठलवाडी व हिललाईन पोलिसांनी गेल्या ३ दिवसात तब्बल ९ बांगलादेशी नागरिकांना अटक करून गुन्हा दाखल केला. मंगळवारी ४, बुधवारी ३ तर गुरुवारी २ अश्या ९ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली असून शहरात बांगलादेशी नागरिकांची संख्या मोठी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

 शहरातील मध्यवर्ती व विठ्ठलवाडी पोलिसांनी मंगळवारी एकूण ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. तर बुधवारी कॅम्प नं-३, फॉरवर्ड लाईन परिसरातील कंवाराम पॅलेस इमारतीमधून जन्नतउल फिरदोस अबुल हाशिम व नासरीन अख्तर नासीर शेख या बांगलादेशी नागरिकाना अटक करून गुन्हा दाखल केला. तर विठ्ठलवाडी पोलिसांनी मराठा सेकशन येथूण नूर मोनू पठाण या बांगलादेशी नागरिकाला अटक करून गुन्हा दाखल केला. त्याला येथे राहण्यास व येण्यास मदत करणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत. गुरुवारी हिललाईन पोलिसांनी गणेश चाळ हाजी मलंग रस्ता येथून अश्ररफ अब्दुल हसन मंडळ या बांगलादेशी नागरिकाला अटक करून गुन्हा दाखल केला. तर विठ्ठलवाडी पोलिसांनी बंजारा कॉलनीतून शर्मिन अख्तर अब्दुल खलील या बांगलादेशी महिलेला अटक करून गुन्हा दाखल केला. 

शहरातील विविध पोलीस ठाण्यात गेल्या ४ महिन्यात ४५ पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना अटक केल्याची नोंद आहे. पोलीस झाडाझाडतीत बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरु असून गेल्या तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. झोपडपट्टी, कारखाने, मुख्य बाजार, इमारत बांधकाम साईट आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक राहत असून पोलिसांनी झाडाझडती घेतल्यास मोठया प्रमाणात बांगलादेशी नागरिक सापडतील.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBangladeshबांगलादेश