शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

भरधाव टेम्पोने दुचाकीला उडविले; चार जण जागीच ठार

By राजकुमार जोंधळे | Updated: March 4, 2023 05:21 IST

जोडजवळा परिसरात रात्री घडली घटना

लातूर : कळंबकडून लातूरच्या दिशेने शिमला मिरची घेऊन निघालेल्या भरधाव पिकअप टॅम्पोने दुचाकीला उडविले. या अपघातात दुचाकीवरील चौघे जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना लातूर तालुक्यातील जोडजवळा परिसरात शुक्रवारी रात्री घडली.

पोलिसांनी सांगितले, लातूरकडून कळंबच्या दिशेने दुचाकीवर चारजण शुक्रवारी रात्री जात होते. दरम्यान, कळंबकडून शिमला मिरची घेऊन लातूरच्या दिशेने पिकअप टेम्पो भरधाव येत होता. जाेडजवळा गावानजीक आल्यानंतर एका धाब्यानजीक भरधाव पिकअप टेम्पोने दुचाकीला जोराने उडविले. या भीषण अपघातात दुचाकीवरील चारजण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी गातेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक खोत यांच्यासह पोलिसांनी भेट दिली. अपघातातील मयत चौघांना लातूरच्या शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. रात्री उशीरापर्यंत दुचाकीवरील मयत चार जणांची नावे हाती आली नाहीत. टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये दुचाकीवरील चारही जण रस्त्यालगत फेकले गेले. यामध्येच ते ठार झाल्याची माहिती गातेगाव ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक किशोर कांबळे यांनी दिली.

रात्रीच्या काळोखात घडला भीषण अपघात...

रात्रीची वेळ आणि सर्वत्र काळोख पसरला होता. दरम्यान, लातूरकडून निधालेल्या दुचाकीला कळंब कडून येणाऱ्या भरधाव टेम्पोने जोराने उडविले. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील चारजण ठार झाल्याची माहिती गातेगाव पोलिसांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात