शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

धक्कादायक! ठाण्यातली 'अंजू' पाकिस्तानला जाऊन आली; गुपचूप लग्न उरकले, पोलिस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 13:12 IST

Thane Girl Travelled to Pakistan: मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशमधील अंजू नावाच्या तरुणीने पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरिक नसरुल्लाह सोबत लग्न केले होते. तसाच प्रकार ठाण्यात उघड झाला आहे.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशमधील अंजू नावाच्या तरुणीने पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरिक नसरुल्लाह सोबत लग्न केले होते. भारताला खिजविण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयएसने त्या दोघांचे फोटोशूट करून सोशल मीडियावर व्हायरलही केले होते. अगदी तसाच प्रकार ठाण्यात घडला आहे. 

ठाण्यातील तरुणीने पाकिस्तानात जावून लग्न केले आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानी तरुणाशी तिची ओळख झाली होती. त्याचे रुपांतर प्रेमात झाले होते. यानंतर तीने गुपचूप पाकिस्तान गाठले आणि तिकडे लग्न उरकून ती पुन्हा अंजूसारखीच भारतात परतली आहे. 

फेसबुकवर झालेल्या ओळखीनंतर ठाण्यातील एका तरुणीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद येथे जावून लग्न केले. काही महिने त्या व्यक्तीसोबत राहिली व ती १७ जुलैला भारतात परतली आहे. ठाणे पोलिसांना याची खबर मिळताच तिला पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी सुरु केली आहे. सनम खान असे या तरुणीने नाव असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 सीमा हैदर ही महिला गेल्या वर्षी भारतात आली होती. ती देखील फेसबुकवरील गेमवर ओळख झाल्याने पती आणि मुलांना सोडून भारतात आली होती. यानंतर अंजूचे प्रकरण बाहेर आले होते. आता ठाण्यातील सनम या तरुणीने पाकिस्तानात जात तेथील व्यक्तीशी लग्न केले आहे. पाकिस्तान हा भारताविरोधात कटकारस्थान करणारा देश आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याने सनम ही खरोखरच लग्न करण्यासाठी गेली होती की हेरगिरी किंवा अन्य काही कारणासाठी गेली होती याचा तपास पोलीस करत आहेत. २०२२ मध्ये नाशिकमधील तरुणीनेही दुबई, लिबियामार्गे पाकिस्तान गाठत लग्न केले होते. तिच्या पालकांनी ती हरविल्याची तक्रार दिली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ती भारतात परतल्यानंतर खरे बिंग उघड झाले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानthaneठाणेCrime Newsगुन्हेगारी