शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

तनवीर बनला यश, मॉडेलशी वाढवली ओळख; सुरुवातीला मैत्री त्यानंतर केले प्रपोज, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 08:42 IST

सध्या या प्रकरणी पोलीस गुन्हा नोंद झाला असून मानवीने ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ जारी करत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

भागलपूर - बिहारच्या भागलपूर येथे राहणारी मानवी राज सिंह नाव सध्या चर्चेत आहे. मानवीनं एका मॉडेलिंग एजेन्सीच्या मालकावर लव्ह जिहाद आणि धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकणे, मारहाण करणे, अश्लिल फोटो शेअर करत जीवे मारण्याची धमकी देणे असे आरोप लावले आहेत. एजेन्सीच्या मालकाने सुरुवातीला त्याचे नाव यश म्हणून सांगितले परंतु त्यानंतर त्याचे खरे नाव तनवीर अख्तर खान असल्याचे मानवीला कळाले. 

मानवीचा आरोप आहे की, तनवीरविरोधात आधीही पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. त्यावेळी तनवीरने एक प्रतिज्ञापत्र सादर करत यापुढे तो मला त्रास देणार नाही असं सांगितले. परंतु त्यानंतर पुन्हा तो मला छळायला लागला. मी मुंबईला आली तेव्हा माझ्या मागे तोही आला. मला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिली. मी वर्सोवा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली असून मला आणि माझ्या कुटुंबाला तनवीरपासून जीवाचा धोका आहे असं तिने सांगितले. 

मानवी आणि तनवीरची ओळख कशी झाली?  मानवी राजच्या शिक्षणाची सुरुवात ही डॉन बॉस्को स्कूलमधून झाली. सध्या ती बी कॉमच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मानवीला मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचे होते. त्यासाठी तिने झारखंड रांची येथील यश मॉडेल एजन्सीशी संपर्क साधला. याठिकाणी मॉडेलिंगबाबत ज्ञान दिले जाते. त्यावेळी तिची ओळख एजन्सी मालक तनवीर अख्तर खानसोबत झाली. तनवीरने मानवीला स्वत:चे नाव यश असल्याचे सांगितले. हळूहळू या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. 

त्यानंतर तनवीरनं मानवीला लग्नासाठी प्रपोज केले. तेव्हा मानवीला यशचे खरे नाव तनवीर अख्तर खान असल्याचे कळाले. ही माहिती मिळताच मानवीने तनवीरसोबत बोलणे सोडले. मात्र तनवीरने तिचा पाठलाग सोडला नाही. मानवीवर लग्नासाठी आणि धर्म परिवर्तनासाठी सातत्याने दबाव टाकत होता. तनवीर मानवीला ब्लॅकमेलिंग करू लागला. मानवीचे अनेक अश्लिल फोटो त्याच्याजवळ होते. तनवीरपासून सुटका व्हावी यासाठी मानवीने रांचीहून मुंबई गाठली. 

सध्या या प्रकरणी पोलीस गुन्हा नोंद झाला असून मानवीने ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ जारी करत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मुंबईहून ही केस रांचीला ट्रान्सफर करण्यात आली आहे. मात्र तनवीरने मानवीचे आरोप फेटाळत म्हणाला की, मानवी माझ्याकडे काम करायची. तिच्यामुळे मला बिझनेसमध्ये नुकसान झाले. त्यासाठी मी तिला भरपाई मागितली. तेव्हापासून ती मला खोट्या केसेसमध्ये अडकवण्यासाठी ब्लॅकमेल करत आहे. मानवीचा बॉयफ्रेंड रवजोत सिंह आणि त्याच्या मित्राने मोबाईल डेटा चोरी करत मला ब्लॅकमेल केले असा दावा केला आहे.