शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तनवीर बनला यश, मॉडेलशी वाढवली ओळख; सुरुवातीला मैत्री त्यानंतर केले प्रपोज, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 08:42 IST

सध्या या प्रकरणी पोलीस गुन्हा नोंद झाला असून मानवीने ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ जारी करत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

भागलपूर - बिहारच्या भागलपूर येथे राहणारी मानवी राज सिंह नाव सध्या चर्चेत आहे. मानवीनं एका मॉडेलिंग एजेन्सीच्या मालकावर लव्ह जिहाद आणि धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकणे, मारहाण करणे, अश्लिल फोटो शेअर करत जीवे मारण्याची धमकी देणे असे आरोप लावले आहेत. एजेन्सीच्या मालकाने सुरुवातीला त्याचे नाव यश म्हणून सांगितले परंतु त्यानंतर त्याचे खरे नाव तनवीर अख्तर खान असल्याचे मानवीला कळाले. 

मानवीचा आरोप आहे की, तनवीरविरोधात आधीही पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. त्यावेळी तनवीरने एक प्रतिज्ञापत्र सादर करत यापुढे तो मला त्रास देणार नाही असं सांगितले. परंतु त्यानंतर पुन्हा तो मला छळायला लागला. मी मुंबईला आली तेव्हा माझ्या मागे तोही आला. मला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिली. मी वर्सोवा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली असून मला आणि माझ्या कुटुंबाला तनवीरपासून जीवाचा धोका आहे असं तिने सांगितले. 

मानवी आणि तनवीरची ओळख कशी झाली?  मानवी राजच्या शिक्षणाची सुरुवात ही डॉन बॉस्को स्कूलमधून झाली. सध्या ती बी कॉमच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मानवीला मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचे होते. त्यासाठी तिने झारखंड रांची येथील यश मॉडेल एजन्सीशी संपर्क साधला. याठिकाणी मॉडेलिंगबाबत ज्ञान दिले जाते. त्यावेळी तिची ओळख एजन्सी मालक तनवीर अख्तर खानसोबत झाली. तनवीरने मानवीला स्वत:चे नाव यश असल्याचे सांगितले. हळूहळू या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. 

त्यानंतर तनवीरनं मानवीला लग्नासाठी प्रपोज केले. तेव्हा मानवीला यशचे खरे नाव तनवीर अख्तर खान असल्याचे कळाले. ही माहिती मिळताच मानवीने तनवीरसोबत बोलणे सोडले. मात्र तनवीरने तिचा पाठलाग सोडला नाही. मानवीवर लग्नासाठी आणि धर्म परिवर्तनासाठी सातत्याने दबाव टाकत होता. तनवीर मानवीला ब्लॅकमेलिंग करू लागला. मानवीचे अनेक अश्लिल फोटो त्याच्याजवळ होते. तनवीरपासून सुटका व्हावी यासाठी मानवीने रांचीहून मुंबई गाठली. 

सध्या या प्रकरणी पोलीस गुन्हा नोंद झाला असून मानवीने ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ जारी करत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मुंबईहून ही केस रांचीला ट्रान्सफर करण्यात आली आहे. मात्र तनवीरने मानवीचे आरोप फेटाळत म्हणाला की, मानवी माझ्याकडे काम करायची. तिच्यामुळे मला बिझनेसमध्ये नुकसान झाले. त्यासाठी मी तिला भरपाई मागितली. तेव्हापासून ती मला खोट्या केसेसमध्ये अडकवण्यासाठी ब्लॅकमेल करत आहे. मानवीचा बॉयफ्रेंड रवजोत सिंह आणि त्याच्या मित्राने मोबाईल डेटा चोरी करत मला ब्लॅकमेल केले असा दावा केला आहे.