शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

सकाळी आवरून मुलाला शाळेत पाठवलं अन् दुपारी मुलाच्या मृत्यूनं कुटुंब हादरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:01 IST

शाळेत शिकणाऱ्या अनुराग नेहरासोबत ही दुर्देवी घटना घडली आहे.

गाझियाबाद – दिल्लीनजीक असलेल्या मोदीनगर परिसरात बुधवारी १२ वर्षाच्या मुलाचा संशयास्पद मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे. हा शाळकरी मुलगा घरातून स्कूल बसनं शाळेत जाण्यासाठी निघाला होता. मात्र एका रस्त्याशेजारी असलेल्या खांबाला धडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचली त्यानंतर तपासाला सुरूवात करण्यात आली आहे.

शाळेत शिकणाऱ्या अनुराग नेहरासोबत ही दुर्देवी घटना घडली आहे. कुटुंबाने सांगितल्यानुसार, मुलाला सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार केले. बॅग आणि जेवणाचा डबा देऊन त्याला शाळेत पाठवलं होते. त्यानंतर काही वेळाने शाळेच्या प्रशासनाकडून घरी फोन आला आणि पालकांच्या पायाखालची जमीन हादरली. शाळेत पाठवलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या कानावर पडल्याने मोठा धक्का बसला. माहितीनुसार, शाळेत जाण्यासाठी तो ज्या स्कूल बसमध्ये बसला होता तेव्हा त्याला उलटी आली. त्यासाठी त्याने खिडकीतून बाहेर डोकावलं तेव्हा रस्त्याशेजारील खांबाला आदळून त्याचा मृत्यू झाला. मात्र शाळा प्रशासन खोटं बोलत असल्याचा आरोप मृत मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. वाहन चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांचा तपास सुरू

मृत मुलाच्या कुटुंबीयांना शाळेवर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांनी म्हटलंय की, शाळेच्या प्रशासनाकडून आमची दिशाभूल करण्यात आली. मुलाची तब्येत ठिक होती मग त्याला झालं काय? शाळा प्रशासन खोटं बोलत असल्याचं कुटुंबीयांचे म्हणणं आहे. मात्र या घटनेमुळे अनुरागच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून सध्या शाळेच्या मुख्याध्यापकांना ताब्यात घेतले आहे. त्याचसोबत इतर चौकशी सुरू आहे.