शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी आवरून मुलाला शाळेत पाठवलं अन् दुपारी मुलाच्या मृत्यूनं कुटुंब हादरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:01 IST

शाळेत शिकणाऱ्या अनुराग नेहरासोबत ही दुर्देवी घटना घडली आहे.

गाझियाबाद – दिल्लीनजीक असलेल्या मोदीनगर परिसरात बुधवारी १२ वर्षाच्या मुलाचा संशयास्पद मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे. हा शाळकरी मुलगा घरातून स्कूल बसनं शाळेत जाण्यासाठी निघाला होता. मात्र एका रस्त्याशेजारी असलेल्या खांबाला धडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचली त्यानंतर तपासाला सुरूवात करण्यात आली आहे.

शाळेत शिकणाऱ्या अनुराग नेहरासोबत ही दुर्देवी घटना घडली आहे. कुटुंबाने सांगितल्यानुसार, मुलाला सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार केले. बॅग आणि जेवणाचा डबा देऊन त्याला शाळेत पाठवलं होते. त्यानंतर काही वेळाने शाळेच्या प्रशासनाकडून घरी फोन आला आणि पालकांच्या पायाखालची जमीन हादरली. शाळेत पाठवलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या कानावर पडल्याने मोठा धक्का बसला. माहितीनुसार, शाळेत जाण्यासाठी तो ज्या स्कूल बसमध्ये बसला होता तेव्हा त्याला उलटी आली. त्यासाठी त्याने खिडकीतून बाहेर डोकावलं तेव्हा रस्त्याशेजारील खांबाला आदळून त्याचा मृत्यू झाला. मात्र शाळा प्रशासन खोटं बोलत असल्याचा आरोप मृत मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. वाहन चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांचा तपास सुरू

मृत मुलाच्या कुटुंबीयांना शाळेवर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांनी म्हटलंय की, शाळेच्या प्रशासनाकडून आमची दिशाभूल करण्यात आली. मुलाची तब्येत ठिक होती मग त्याला झालं काय? शाळा प्रशासन खोटं बोलत असल्याचं कुटुंबीयांचे म्हणणं आहे. मात्र या घटनेमुळे अनुरागच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून सध्या शाळेच्या मुख्याध्यापकांना ताब्यात घेतले आहे. त्याचसोबत इतर चौकशी सुरू आहे.