शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, सगळेच हादरले, पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 16:46 IST

राहुलचा मृतदेह घरच्या अंगणात लटकलेल्या अवस्थेत होता तर पत्नी आणि लहान मुलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात खोलीत पडल्याचं दिसून आले.

प्रयागराज – नवाबगंजच्या खागलपूर गावात घडलेल्या एका घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. याठिकाणी एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृतदेह आढळला. आता त्याला वेगळं वळण आले आहे. घटनेच्या रात्री एकही बाहेरचा व्यक्ती घरात आला नाही. त्यामुळे आता संशयाची सुई घराच्या अंगणात मृत अवस्थेत लटकणाऱ्या राहुल याच्यावर जाते. पोलीस सध्या सर्व बाजूने तपास करत आहेत. कुटुंबातील ५ जणांच्या संशयास्पद मृत्यूने सगळेच हादरले आहेत.

पोलीस तपासात आता एका खोलीत सुसाईड नोट आढळली आहे. जी राहुल याने लिहिल्याचं समोर आले आहे. राहुलने  मृत्यूसाठी जबाबदार सासरच्या ११ मंडळींना धरलं आहे. नोव्हेंबर २०२१ पासून राहुल तिवारी भागलपूर गावात कुटुंबासह राहत होता. तो मूळचा कौशांबीचा आहे. रात्री उशीरा राहुल तिवारी कुटुंबासह जेवण करून झोपला होता. मृतकाचे कुटुंब ज्याठिकाणी राहत होते तेथील शेजारील व्यक्तीने घरातील कुणीच सकाळी बाहेर निघालं नाही म्हणून आत डोकावून पाहिले तेव्हा घरातील दृश्य पाहून त्याच्या अंगावर काटा आला.

राहुलचा मृतदेह घरच्या अंगणात लटकलेल्या अवस्थेत होता तर पत्नी आणि लहान मुलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात खोलीत पडल्याचं दिसून आले. या घटनेनंतर गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. ५ लोकांच्या संशयास्पद मृत्यूने सगळे गावकरी भयभीत झालेत. या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. जर आरोपीने ४ लोकांची हत्या केली तर राहुलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत कसा सापडला? त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सर्व अँगलनं विचार करत आहेत.

राहुलनं घेतला कुटुंबातील सदस्यांचा जीव?

घटनास्थळावर सापडलेल्या पुराव्यावरून संशयाची सुई मृत राहुलच्या दिशेने जात आहे. परंतु हे टोकाचं पाऊल राहुलनं का उचललं हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आई आणि ३ मुलांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूणा आहेत. परंतु राहुलच्या मृतदेहावर कुठलेही निशाण नाही. त्याचा मृतदेह अंगणात लटकलेल्या अवस्थेत सापडला. आता राहुलचा मृत्यू कसा झाला यासाठी पोलीस पोस्टमोर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.

सासरच्यांसोबत होता वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल आणि त्याच्या सासरच्या मंडळीसोबत काही कारणावरून वाद होता. राहुलच्या सासरची माणसं त्याचा मेव्हुणा त्याला खूप त्रास देत असल्याचं राहुलच्या बहिणींनी सांगितले. या बहिणींनी राहुलच्या मेहुण्यांवर हत्येचा आरोप केला आहे. मात्र जर मेव्हुण्यांनी राहुलला मारलं असेल तर बहिण आणि तिच्या मुलांना कोणी मारलं? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात ४ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ७ जणांचं पथक बनवण्यात आल्याची माहिती एसएसपी अजय कुमार यांनी दिली.