शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, सगळेच हादरले, पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 16:46 IST

राहुलचा मृतदेह घरच्या अंगणात लटकलेल्या अवस्थेत होता तर पत्नी आणि लहान मुलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात खोलीत पडल्याचं दिसून आले.

प्रयागराज – नवाबगंजच्या खागलपूर गावात घडलेल्या एका घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. याठिकाणी एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृतदेह आढळला. आता त्याला वेगळं वळण आले आहे. घटनेच्या रात्री एकही बाहेरचा व्यक्ती घरात आला नाही. त्यामुळे आता संशयाची सुई घराच्या अंगणात मृत अवस्थेत लटकणाऱ्या राहुल याच्यावर जाते. पोलीस सध्या सर्व बाजूने तपास करत आहेत. कुटुंबातील ५ जणांच्या संशयास्पद मृत्यूने सगळेच हादरले आहेत.

पोलीस तपासात आता एका खोलीत सुसाईड नोट आढळली आहे. जी राहुल याने लिहिल्याचं समोर आले आहे. राहुलने  मृत्यूसाठी जबाबदार सासरच्या ११ मंडळींना धरलं आहे. नोव्हेंबर २०२१ पासून राहुल तिवारी भागलपूर गावात कुटुंबासह राहत होता. तो मूळचा कौशांबीचा आहे. रात्री उशीरा राहुल तिवारी कुटुंबासह जेवण करून झोपला होता. मृतकाचे कुटुंब ज्याठिकाणी राहत होते तेथील शेजारील व्यक्तीने घरातील कुणीच सकाळी बाहेर निघालं नाही म्हणून आत डोकावून पाहिले तेव्हा घरातील दृश्य पाहून त्याच्या अंगावर काटा आला.

राहुलचा मृतदेह घरच्या अंगणात लटकलेल्या अवस्थेत होता तर पत्नी आणि लहान मुलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात खोलीत पडल्याचं दिसून आले. या घटनेनंतर गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. ५ लोकांच्या संशयास्पद मृत्यूने सगळे गावकरी भयभीत झालेत. या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. जर आरोपीने ४ लोकांची हत्या केली तर राहुलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत कसा सापडला? त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सर्व अँगलनं विचार करत आहेत.

राहुलनं घेतला कुटुंबातील सदस्यांचा जीव?

घटनास्थळावर सापडलेल्या पुराव्यावरून संशयाची सुई मृत राहुलच्या दिशेने जात आहे. परंतु हे टोकाचं पाऊल राहुलनं का उचललं हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आई आणि ३ मुलांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूणा आहेत. परंतु राहुलच्या मृतदेहावर कुठलेही निशाण नाही. त्याचा मृतदेह अंगणात लटकलेल्या अवस्थेत सापडला. आता राहुलचा मृत्यू कसा झाला यासाठी पोलीस पोस्टमोर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.

सासरच्यांसोबत होता वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल आणि त्याच्या सासरच्या मंडळीसोबत काही कारणावरून वाद होता. राहुलच्या सासरची माणसं त्याचा मेव्हुणा त्याला खूप त्रास देत असल्याचं राहुलच्या बहिणींनी सांगितले. या बहिणींनी राहुलच्या मेहुण्यांवर हत्येचा आरोप केला आहे. मात्र जर मेव्हुण्यांनी राहुलला मारलं असेल तर बहिण आणि तिच्या मुलांना कोणी मारलं? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात ४ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ७ जणांचं पथक बनवण्यात आल्याची माहिती एसएसपी अजय कुमार यांनी दिली.