शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, सगळेच हादरले, पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 16:46 IST

राहुलचा मृतदेह घरच्या अंगणात लटकलेल्या अवस्थेत होता तर पत्नी आणि लहान मुलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात खोलीत पडल्याचं दिसून आले.

प्रयागराज – नवाबगंजच्या खागलपूर गावात घडलेल्या एका घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. याठिकाणी एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृतदेह आढळला. आता त्याला वेगळं वळण आले आहे. घटनेच्या रात्री एकही बाहेरचा व्यक्ती घरात आला नाही. त्यामुळे आता संशयाची सुई घराच्या अंगणात मृत अवस्थेत लटकणाऱ्या राहुल याच्यावर जाते. पोलीस सध्या सर्व बाजूने तपास करत आहेत. कुटुंबातील ५ जणांच्या संशयास्पद मृत्यूने सगळेच हादरले आहेत.

पोलीस तपासात आता एका खोलीत सुसाईड नोट आढळली आहे. जी राहुल याने लिहिल्याचं समोर आले आहे. राहुलने  मृत्यूसाठी जबाबदार सासरच्या ११ मंडळींना धरलं आहे. नोव्हेंबर २०२१ पासून राहुल तिवारी भागलपूर गावात कुटुंबासह राहत होता. तो मूळचा कौशांबीचा आहे. रात्री उशीरा राहुल तिवारी कुटुंबासह जेवण करून झोपला होता. मृतकाचे कुटुंब ज्याठिकाणी राहत होते तेथील शेजारील व्यक्तीने घरातील कुणीच सकाळी बाहेर निघालं नाही म्हणून आत डोकावून पाहिले तेव्हा घरातील दृश्य पाहून त्याच्या अंगावर काटा आला.

राहुलचा मृतदेह घरच्या अंगणात लटकलेल्या अवस्थेत होता तर पत्नी आणि लहान मुलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात खोलीत पडल्याचं दिसून आले. या घटनेनंतर गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. ५ लोकांच्या संशयास्पद मृत्यूने सगळे गावकरी भयभीत झालेत. या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. जर आरोपीने ४ लोकांची हत्या केली तर राहुलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत कसा सापडला? त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सर्व अँगलनं विचार करत आहेत.

राहुलनं घेतला कुटुंबातील सदस्यांचा जीव?

घटनास्थळावर सापडलेल्या पुराव्यावरून संशयाची सुई मृत राहुलच्या दिशेने जात आहे. परंतु हे टोकाचं पाऊल राहुलनं का उचललं हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आई आणि ३ मुलांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूणा आहेत. परंतु राहुलच्या मृतदेहावर कुठलेही निशाण नाही. त्याचा मृतदेह अंगणात लटकलेल्या अवस्थेत सापडला. आता राहुलचा मृत्यू कसा झाला यासाठी पोलीस पोस्टमोर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.

सासरच्यांसोबत होता वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल आणि त्याच्या सासरच्या मंडळीसोबत काही कारणावरून वाद होता. राहुलच्या सासरची माणसं त्याचा मेव्हुणा त्याला खूप त्रास देत असल्याचं राहुलच्या बहिणींनी सांगितले. या बहिणींनी राहुलच्या मेहुण्यांवर हत्येचा आरोप केला आहे. मात्र जर मेव्हुण्यांनी राहुलला मारलं असेल तर बहिण आणि तिच्या मुलांना कोणी मारलं? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात ४ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ७ जणांचं पथक बनवण्यात आल्याची माहिती एसएसपी अजय कुमार यांनी दिली.