शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धक्कादायक! विधवा वहिनीसोबत लग्नाचा होता दबाव, तरूणाने रेल्वेसमोर येऊन केली आत्महत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 13:05 IST

मृत तरूणाच्या परिवाराने आरोप केला आहे की, त्यांच्या विधवा सूनेच्या परिवाराला कंटाळून त्यांच्या लहान मुलाने मृत्युला जवळ केलं.

हरयाणाच्या फतेहाबादमध्ये एका तरूणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. पोस्टमार्टमनंतर तरूणाचा मृतदेह परिवाराकडे सोपवण्यात आलं आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. अशात मृत तरूणाच्या परिवाराने आरोप केला आहे की, त्यांच्या विधवा सूनेच्या परिवाराला कंटाळून त्यांच्या लहान मुलाने मृत्युला जवळ केलं.

असे सांगितले जात आहे की, मृत तरूणावर विधवा वहिनीच्या परिवाराकडून लग्नासाठी दबाव टाकला जात होता. पण तो यासाठी तयार नव्हता. विधवा वहिनीच्या परिवारातील लोक पीडित परिवाराला सतत धमक्या देत होते. ज्यामुळे चिंतेत असलेल्या तरूणाने रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली.

मृत तरूणाचे वडील विनोद कुमार म्हणाले की, तीन वर्षाआधी त्यांच्या मोठ्या मुलाचं निधन झालं होतं. नंतर विधवा सूनेच्या परिवारातील लोकांना आमच्या लहान मुलासोबत तिचं लग्न लावून द्यायचं होतं. पण त्यांचा लहान मुलगा या नात्यासाठी अजिबात तयार नव्हता. सूनेच्या परिवाराकडून यासाठी सतत दबाव टाकला जात होता. (हे पण वाचा : पत्नीच्या अफेअरला कंटाळून पतीने स्वत:वर झाडली गोळी, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ केल शेअर!)

मृत तरूणाच्या वडिलांचा आरोप आहे की, काही दिवसांपूर्वी सूनेच्या एका नातेवाईकांचा फोन आला होता की, जर हे नातं ठरलं नाही तर तो त्याच्या परिवाराविरोधात पोलिसात तक्रार देईल. इतकेच काय तर ते लहान मुलाला खोट्या रेप केसमध्येही फसवतील अशीही त्यांनी धमकी दिली होती. यामुळे माझा लहान मुलगा चिंतेत होता आणि म्हणून त्याने आत्महत्या केली.

रेल्वेच्या जीआरपी पोलीस अधिकारी धर्मपाल सिंह यांनी सांगितले की, ३१ वर्षीय तरूणाचा दिल्लीहून श्रीगंगानगरला जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनखाली येऊन मृत्यू झाला. मृतदेहाजवळ एक मोटारसायकल आणि काही कागदपत्रे मिळाली आहेत. त्यानंतर मृतकाच्या परिवाराला माहिती देण्यात आली.   

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी