शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

वरिष्ठांविरोधात लेटरबॉम्ब टाकून उपनिरीक्षक बेपत्ता; कळंबोली पोलीस ठाण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:42 IST

कळंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक मनेष बच्छाव शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पोलीस महासंचालक यांना पाठवलेले पत्र व्हायरल झाले आहे.

- सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वरिष्ठांकडून गैरउद्देशाने छळ होत असल्याचा आरोप करत पोलीस उपनिरीक्षक बेपत्ता झाल्याची घटना कळंबोली पोलीस ठाण्यात घडली आहे. दरम्यान, वर्षभरापूर्वी एक हवालदारदेखील अशाच प्रकारे बेपत्ता झाल्याची घटना याच ठिकाणी घडली होती. उपनिरीक्षकाने मुख्यमंत्री तसेच पोलीस महासंचालक यांच्याकडे टाकलेल्या लेटरबॉम्बमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे नवी मुंबईत बदल्यांमागे अर्थकारण होत असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

कळंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक मनेष बच्छाव शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पोलीस महासंचालक यांना पाठवलेले पत्र व्हायरल झाले आहे. या लेटरबॉम्बमध्ये त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याकडून छळ होत असल्याचा आरोप केला आहे. हा छळ टार्गेटपूर्तीच्या उद्देशाने होत असल्याचाही उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी याच पोलीस ठाण्यातील एका हवालदारानेदेखील अशाच प्रकारे वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अज्ञातवास गाठला होता.

बदल्यांमागे अर्थकारणनवी मुंबई पोलीस आयुक्तालयात बदल्यांमागे मोठे अर्थकारण होत असल्याच्या चर्चा यापूर्वीही रंगल्या होत्या. त्यातूनच अवैध धंद्यांना थारा मिळत असल्याचेही बोलले जात होते. अशातच उपनिरीक्षकानेच वरिष्ठांवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, लेटरबॉम्ब टाकून बेपत्ता झालेल्या उपनिरीक्षक मनेष बच्छाव यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह व उपायुक्त शिवराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Policeपोलिस