शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वाड्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच! पोलिसांपुढे आव्हान :तालुक्यात डझनभर घरे फोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 01:31 IST

वाडा : तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सोनाळे परिसरात शनिवारी रात्री एकाच वेळी डझनभर घरे चोरट्यांनी फोडली.

वाडा : तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सोनाळे परिसरात शनिवारी रात्री एकाच वेळी डझनभर घरे चोरट्यांनी फोडून ६१ हजार रु पये किंमतीचा रोख रकमेसहित ऐवज लंपास केल्याच्या घटनेनंतर काल रात्री वाडा शहरातील शिवाजी नगर परिसरात दोन घरफोड्या करून हिरे व सोन्याचे दागिने असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या नित्याच्याच चोऱ्यांमुळे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.वाडा तालुक्यात गेल्या दोन महिन्यात चोरट्यांनी अक्षरश: धूमाकूळ घातला असून वाडा शहर, गोºहे, नाणे, कुडूस, मेट, शिरीषपाडा, वावेघर, नेहरोली आदी ठिकाणी घरे दुकाने फोडून व दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे खुपरी येथील घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. विशेषत: गोºहे येथील दुकानदार प्रकाश खिलारे यांचे दुकान फोडल्याने खिलारे यांना हृदयविकाराचा झटका येऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला होता. या सर्व घटनांनी तालुक्यातील नागरिक धास्तावले असून गुन्हेगारांना कधी चाप बसेल याच्या प्रतिक्षेत आहेत.शनिवारी (दि. ४)रात्रीच्या सुमारास सोनाळे परिसरातील मोजमध्ये तीन घरे, बिलघर मध्ये आठ घरे व सोनाळे मध्ये एक घर अशी एकूण बारा घरे फोडून चांदी व सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६१ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या बारा घरफोड्यांमध्ये नामदेव पठारे, बाळकृष्ण पठारे, एकनाथ गव्हाळे, भास्कर गव्हाळे, सुभाष गव्हाळे, बबन जोगमार्गे, शांता शांताराम पठारे, काशिनाथ गव्हाळे, किसन दळवी, वैभव पठारे मनोहर घागस यांच्या घरांचा समावेश असून हे सर्व नोकरी धंदानिमित्त विविध शहरात राहत असल्याने व गावाकडील घरे बंद असल्याने चोरट्यांनी येथे डल्ला मारला आहे.तसेच रविवारी (दि. ५) वाडा शहरातील शिवाजी नगर येथे राहणा-या उदय नाईक व कल्पना ठाकरे यांची घरे फोडून नाईक यांच्या घरातील एक हि-याचा पावणेतीन लाख रु पये किंमतीचा हार, दोन अंगठ्या, कर्णफुले व ४० हजार रु पये रोख रक्कम तर ठाकरे यांच्या घरातील एलसीडी टीव्ही व किरकोळ सामान असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अलका करडे करीत आहेत.दरम्यान, तालुक्यात लग्न सराई जोरदार सुरू आहे. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत नागरिकांचे जाणे येणे सुरू असते. पंरतु पोलिसांच्या नाका बंदी व गस्तीमुळे सामान्य नागरिकालाही पोलिसांच्या चौकशीला व कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. गुन्हेगारांना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून लवकरात लवकर या चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत. तर पोलीस ही कामगिरी लवकरच पार पाडू असा निर्वाळा देत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार