शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Rashmi shukla: राज्य सरकार रश्मी शुक्ला यांचा अहवाल सीबीआयला देण्यास तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 08:11 IST

३१ ऑगस्टपर्यंत सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सुपुर्द करू, अशी हमी राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील रफिक दादा यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाला दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पोलीस बदल्या व नियुक्त्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेला अहवाल सीबीआयकडे सुपुर्द करण्यास तयार आहोत, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.

३१ ऑगस्टपर्यंत सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सुपुर्द करू, अशी हमी राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील रफिक दादा यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाला दिली.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने राज्य सरकारकडून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेला अहवाल व अन्य काही कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारने या कागदपत्रांची अन्य एका तपासात आवश्यकता आहे, असे म्हणत सीबीआयला कागदपत्रे देण्यास नकार दिला.

महाराष्ट्र सरकार आपल्याला तपासात सहकार्य करत नाही, असे म्हणत सीबीआयने कागदपत्रे मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याआधीच्या सुनावणीत राज्य सरकारने ही कागदपत्रे देशमुख यांच्या विरोधात तपास करण्यासाठी आवश्यक नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला सीबीआयकडे कागदपत्रे सुपुर्द करण्याचा विचार करा, अशी सूचना केली होती.

सीबीआयने राज्य सरकारकडे रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना पाठवलेले पत्र, पोलीस नियुक्त्या व बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत सादर केलेला अहवाल आणि अहवालासोबत जोडलेली कागदपत्रे तसेच कागदपत्रे एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे कशी गेली, याचा पंचनामा इत्यादी कागदपत्रे मागितली आहेत. रफिक दादा यांनी सीबीआयला पंचनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. कारण त्या आधारावर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती न्यायालयाला दिली.

पंचनामा हा केवळ अहवाल कुठून कसा गेला, हे तपासण्यासाठी हवा आहे, अशी माहिती सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला दिली. मात्र, दादा यांनी सीबीआयच्या या मागणीला विरोध केला. देशमुख यांच्याविरोधात तपासाचा आणि पंचनाम्याचा काहीही संबंध नाही, असे दादा यांनी न्यायालयाला सांगितले. रश्मी शुक्ला यांनी सादर केलेला अहवाल सीबीआयला ३१ ऑगस्टपर्यंत सुपुर्द करू, हे राज्य सरकारचे विधान स्वीकारत न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २ सप्टेंबर रोजी ठेवली.

मुळातच या गोष्टी न्यायालयासमोर येता कामा नयेत. अनेक वेळा सीबीआय व महाराष्ट्र सरकारने कागदपत्रांची देवाण-घेवाण केली आहे. राज्यांतर्गत व अन्य राज्यासंबंधी गुन्ह्याच्या तपसासंदर्भात सरकारने सीबीआयला कागदपत्रे दिली आहेत, असे न्यायालयाने म्हटले. 

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्ला