शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

...म्हणून 'या' आयपीएस अधिकाऱ्याने दिला राजीनामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 19:23 IST

नागरीकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ अब्दुल रेहमान यांनी दिला राजीनामा

ठळक मुद्देविधेयकाच्या निषेधार्थ राज्य पोलीस दलातही आयपीएस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ माजली आहे. धर्माच्या आधारावर कुठलाही कायदा किंवा निर्णय घेतला जाऊ शकत नाही.

मुंबई - नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (कॅब) अखेर मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाविरोधात देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरु झाले आहे. तसेच विधेयकाच्या निषेधार्थ राज्य पोलीस दलातही आयपीएस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ माजली आहे. 

अब्दुल रेहमान यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या संविधानाविरोधात असल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. सर्व न्यायप्रेमींनी लोकशाही पद्धतीने या विधेयकाला विरोध करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. आयपीएस अधिकारी रहमान यांनी आपल्या ट्विटरवरून केंद्रीय गृहमंत्री यांना निशाणा साधला आहे. नागरिकत्वाच्या समर्थनासाठी गृहमंत्री देत असलेला तर्क चुकीचा असल्याचे त्यांनीम्हटले आहे. 

दरम्यान, बुधवारी राज्यसभेत विधेयकाला मंजुरी मिळाली. मतदानावेळी शिवसेनेने सभात्याग केला. विधेयकाच्या बाजूने १२५ मते पडली तर विधेयकाविरोधात १०५ मते पडली. राज्यसभेत देखील हे विधेयक मंजूर झाल्याने देशातील सर्व राज्यांत हे विधेयक लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अब्दुल रेहमान हे सध्या राज्याच्या मानवी हक्क आयोगाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार गैरवर्तणुकीबद्दल त्यांच्यावर खात्यांतर्गत चौकशी सुरु आहे. राजीनाम्याच्या पत्रात रेहमान यांनी अनेक आरोप केले आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मुस्लिम समाजासोबत भेदभाव करणारे आहे. संविधानाने कलम १४, १५ आणि २५ नुसार समानतेच्या मूकबहुत अधिकारांचे या विधेयकामुळे उल्लंघन होत आहे. 

धर्माच्या आधारावर कुठलाही कायदा किंवा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. मुस्लिम समाजाला वेगळे पडणारे असे हे विधेयक आहे, असा आरोप अब्दुल रेहमान यांनी केला आहे. अब्दुल रेहमान यांनी आपल्या ट्विटरमध्ये दोन पत्र जोडली आहेत. एका ट्विटरमध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसऱ्या पत्रात कॅबला विरोध करण्याची कारणमीमांसा स्पष्ट केली आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व दुसृष्टी विधेयक (कॅब) हे दोन्ही विधेयकं एकत्र राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आसाममधून १९ लाख नागरिक एनआरसीच्या बाहेर ठेवले गेले आहे. त्यात १४ ते १५ लाख हिंदूंचा समावेश आहे. एनआरसी आणि कॅब एकत्र लागू केले तर दलित, आदिवासी आणि मुस्लिम यांच्यापैकी कुणीही जर नागरिकत्व सिद्ध करणारी कागदपते देऊ शकली नाही तर त्यांना निर्वासित म्हणून घोषित करण्यात येईल. त्यामुळे अनुसूचित जाती - जमाती आणि मुस्लिम समुदाय या विधेयकाला विरोध करण्यासाठी आवाहन करतो असे रेहमान यांनी पत्रात मांडले आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliceपोलिसTwitterट्विटरResignationराजीनामा