शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोर सोडून संन्याशाची हत्या! अंत्यविधीसाठी निघालेल्या त्र्यंबकेश्वर येथील महाराज हल्ल्यात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 18:59 IST

चोरांच्या अफवेत कासा जवळील गडचिंचले येथील घटना

ठळक मुद्देगडचिंचले गावातील जमावाने चोर असल्याच्या संशयावरून हल्ला चढविला व यात या तिघा निष्पाप व्यक्तीचा नाहक बळी गेल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडलीठीकठिकाणी प्रवेश बंदी असल्याने हे वेगवेगळ्या मार्गाने कासा हद्दीत पोहोचले आणि गडचिंचले येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.

हुसेन मेमन / शशिकांत ठाकूर

जव्हार/ कासा - कांदिवली येथून भाड्याच्या वाहनाने सुरत येथे अंत्यविधीसाठी निघालेल्या त्र्यंबकेश्वर येथील श्री मौनीबाबा मठ तथा दक्षिणमुखी हनुमान मंदीर आश्रमाचे मुख्य महंत श्री कल्पवृक्ष गिरी तथा चिकना अघोरी महाराज हे (70) यांचा व त्यांचे कांदिवली येथील शिष्य सुशीलगिरी महाराज (30) व कारचालक निलेश तेलवडे (30) अशा तीन जणांना डहाणू तालुक्यातील कासा हद्दीतील सायवन-दाभाडी-खानवेल या रस्त्यात लगत असलेले गडचिंचले गावातील जमावाने चोर असल्याच्या संशयावरून हल्ला चढविला व यात या तिघा निष्पाप व्यक्तीचा नाहक बळी गेल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडली, याचे पडसाद सर्वत्र पसरले आहेत.मुबंईहून भाड्याच्या कारने प्रवासी पास नसताना सुरतकडे रवानामुंबई येथुन ज्या कारमध्ये हे प्रवास करत होते. त्या कारच्या नोंदणी क्रमांकावरून कार मालकाचा पत्ता कासा पोलिसांनी मिळवला आणि तेथून कार मालकाने दिलेल्या माहितीनुसार हे तिघे कांदिवली येथून कल्पवृक्षगिरी महाराज यांच्या शिष्याचे निधन झाल्यामुळे ते अंतीमविधीसाठी सुरतला जाणार होते, मात्र त्यांना सुरत जाण्यासाठी लॉकडाऊन काळात प्रवासी पास मिळाला नाही. त्यामुळे हे पास न घेताच सुरतकडे रवाना झाले. मात्र, ठीकठिकाणी प्रवेश बंदी असल्याने हे वेगवेगळ्या मार्गाने कासा हद्दीत पोहोचले आणि गडचिंचले येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.जमावाने पोलिसांच्या गाडीतून जात असताना पुन्हा चढवला हल्ला आणि पोलीस वाहनाची केली तोडफोडकासा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब पोलीस घटनास्थळी पोहचले व त्यांनी या तिघांना ताब्यात घेत पोलीस वाहनात बसवले मात्र, जमावाने कुठलेही भान न ठेवता पोलीस वाहनात बसलेल्या या तिघांना दगड, काठी, सळईने मारण्यास सुरवात केली यात पोलिसांनी आपला जीव वाचवत बाहेर पडले मात्र जमाव संख्या जास्त असल्यामुळे पोलिसही हतबल झाले आणि पोलिसांच्या समोरच या तिघांचा जमावाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.अटक करण्यात आलेल्या 110 आरोपींपैकी 9 आरोपी 18 वर्षांखलील असल्याने त्यांना बालसुधारगृह भिवंडी येथे पाठविण्यात आले असून इतर 101 आरोपींना डहाणू कोर्टात हजर करण्यात आले आहे. तर काही आरोपी फरार असून त्यांचा शोध कासा पोलीस करीत आहे.महाराजांबाबत माहिती  

कल्पवृक्षगिरी तथा चिकना अघोरी हे येथील श्रीपंचायती दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे महंत होते. त्र्यंबकेश्वर व इतरही ठिकाणी भरणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यात ते आपल्या अखाड्या तर्फे शाहीस्नान करीत असत. ते अखाड्यात राहात नसले तरी स्वतंत्र आश्रमात राहात असत. त्र्यंबकेश्वर सह मुंबई गुजरात उत्तर प्रदेश आदी ठिकाणी त्यांचे मठ आश्रम होते. भारतात त्यांचे अनेक भक्त होते. दरम्यान, त्यांचा शिष्य परिवार त्यांचे पार्थिव कासा येथून त्र्यंबकेश्वर आश्रमात आणून त्यांना समाधी देणार असल्याचे समजते.

टॅग्स :PoliceपोलिसMurderखूनArrestअटक