शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

लग्नानंतर काही दिवसांतच दिराच्या प्रेमात पडली वहिनी, एकत्र येणे अशक्य झाल्यावर उचललं टोकाचं पाऊल आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 16:28 IST

Crime News: अनैतिक संबंधांचा शेवट हा वाईटच होतो, असं म्हटलं जातं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला पती असतानाही दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली. नात्यांच्या मर्यादा ओलांडत त्यांनी एक होण्याचा निर्णय घेतला. मात्र...

पाटणा - अनैतिक संबंधांचा शेवट हा वाईटच होतो, असं म्हटलं जातं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील  एक महिला पती असतानाही दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली. नात्यांच्या मर्यादा ओलांडत त्यांनी एक होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या प्रेमप्रकरणाची खबर दिल्लीत राहत असलेल्या या महिलेच्या पतीला समजली आणि वादाला सुरुवात झाली. कुटुंबीयांनी या प्रेमप्रकरणाला विरोध कऱण्यास सुरुवात केली. मात्र एकमेकांसोबत जगण्यामरण्याच्या शपथा खाल्लेले हे दोघेही घरातून पळून गेले. मात्र दीड महिन्यापूर्वी गाव सोडलेल्या या जोडप्याला एकत्र राहणे अशक्य झाले तेव्हा त्यांनी एकमेकांसोबत मरण्याची शपथ घेऊन स्टेशनवर येत विषप्राशन केले. यामध्ये या महिलेचा प्रियकर असलेल्या दिराचा मृत्यू झाला. तर ही महिला मृत्यूशी लढा देत आहे.

नालंदा जिल्ह्यातील हरनौत पोलीस ठाणे क्षेत्रातील हरनौत रेल्वे स्टेशनवर एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या दीर आणि त्याच्या वहिनीने विषप्राशन केले. विषप्राशन केल्यानंतर दीर कुंदन कुमार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याच्या वहिनीची प्रकृती गंभीर आहे. हरनौत येथील चक जेनाब गावातील बिंदेश्वरी यादव यांचा पुत्र राकेश कुमार याचा विवाह एक वर्षापूर्वी रहुईमधील अम्बा गावातील रहिवासी शबनम कुमारी हिच्याशी झाला होता. विवाहानंतर शबनमचा पती जेव्हा दिल्लीला गेला तेव्हा तिच्यात आणि तिच्या दिरामध्ये जवळीक निर्माण झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यातूनच ते घर सोडून पळून गेले.

दीड महिन्यांपूर्वी गाव सोडून गेलेले हे युगुल काही दिवसांपूर्वी हरनौत येथील रेल्वे स्टेशनवर परत आले. तिथे त्यांनी एकत्रच विषप्राशन केले. त्यात कुंदन याचा मृत्यू झाला. तर त्याची वहिनी असलेल्या या महिलेची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या प्रकाराची कल्पना दोघांच्याही कुटुंबाला देण्यात आली आहे. एएसआय वीर बहादूर यांनी सांगितले की, एका जोडप्याने विषप्राशन केल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली. त्यानंतर या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. तर महिलेची प्रकृती गंभीर आहे.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी