शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राजस्थानमधील व्यापाऱ्यावर गोळीबार; हत्येची सुपारी देणाऱ्याला डोंबिवलीतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 13:20 IST

Crime News : राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील गांधीपथ, अवधपुरी याठिकाणी कुटुंबासह वास्तव्याला असलेल्या आदित्य पन्नालाल जैन (वय 41) यांच्यावर 16 जूनला प्राणघातक हल्ला झाला.

कल्याण : राजस्थान येथील व्यापा-याला जीवे मारण्याची सुपारी देणा-याला डोंबिवलीतून अटक केली. कल्याण आणि उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली. राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील गांधीपथ, अवधपुरी याठिकाणी कुटुंबासह वास्तव्याला असलेल्या आदित्य पन्नालाल जैन (वय 41) यांच्यावर 16 जूनला प्राणघातक हल्ला झाला. जैन हे त्यांची गाडी साफसफाई करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी पिस्तुलातून त्यांच्यावर तीन गोळया झाडल्या. यातील एक गोळी जैन यांच्या हाताला लागून ते गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत त्यांनी तेथील करणी विहार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत आदित्य हे त्यांचे कुटुंबासह 2018 ते 2020 या कालावधीत डोंबिवलीत राहत होते. त्या दरम्यान डोंबिवली येथे राहणारा कमलेश शेषराव शिंदे हा नेहमी त्यांचे दुकानात येत जात असायचा. यात तो आदित्य यांच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम करून तिला त्रास देऊ लागला. या त्रासाला कंटाळून आदित्य कुटुंबासह राजस्थान येथे राहण्यास गेले. परंतू कमलेशने आदित्य यांना जीवे ठार मारण्याकरिता एका व्यक्तीला सुपारी दिली त्यानुसार दोन व्यक्तींनी राजस्थान येथे जाऊन आदित्य जैन यांचेवर जीवघेणा हल्ला केला. 

या गुन्ह्याचे तपासकामी सोमवारी राजस्थान पोलिसांचे पथक डोंबिवली येथे आले होते. त्यांनी दिलेल्या माहीतीवरून या गुन्हयाचा तपास कल्याण आणि उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाकडून संयुक्तपणो करण्यात आला. यात पोलीस उपनिरिक्षक नितीन मुदगुन, मोहन कळमकर, पोलीस हवालदार राजेंद्र घोलप, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिल्लारे, मंगेश शिर्के, अजितसिंग राजपूत यांच्यासह उल्हानगर गुन्हे पोलीसांनी कसोशीने तपास करीत हत्येची सुपारी देणा-या कमलेशला डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा येथून ताब्यात घेतले. आरोपीला  राजस्थान पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहीती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजू जॉन यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण