शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धक्कादायक! गैरसमजुतीतून एकाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 20:34 IST

दोघांना वालीव पोलिसांनी अटक केले आहे. 

ठळक मुद्दे पोमण गावातील इंडस्ट्रीयल परिसरात नोकरीच्या शोधात एक अनोळखी पुरुष आला होता. तो पुरुष ज्या घरात पाणी पिण्यासाठी शिरला होता त्या घरात तीनही महिला होत्या.

नालासोपारा - कामण - भिवंडी रोडवरील पोमण गावात गैरसमजुतीमुळे ४० वर्षीय पुरुषाची दोघांनी निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली आहे. खून झाल्यानंतर पुरुषाचा मृतदेह मोकळ्या मैदानात फेकून देण्यात आला होता. वालीव पोलिसांनी खुनाचा गुन्हा, पुरावा नष्ट करणे याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून खून करणाऱ्या दोघांना वालीव पोलिसांनीअटक केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय चौगुले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोमण गावातील इंडस्ट्रीयल परिसरात नोकरीच्या शोधात एक अनोळखी पुरुष आला होता. ऊन आणि गर्मीमुळे तणावात असलेला पुरुष एका घरात पाणी पिण्यासाठी घुसला. मात्र, बाजूलाच बसलेले चिंतामण धर्मा भुरकुंड (४५) आणि पुतण्या साईराज गजानज भुरकुंड (२१) यांना काही वेगळेच वाटल्याने गैरसमज झाला. कारण तो पुरुष ज्या घरात पाणी पिण्यासाठी शिरला होता त्या घरात तीनही महिला होत्या. याच विषयामुळे काका आणि पुतण्याने पाहिले लाकडी दांड्याने मारहाण केली आणि नंतर दगडाने चेचून त्याचा खून करण्यात आला आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह काका पुतण्याने उचलून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानात फेकून दिला होता. पोलिसांनी काका पुतण्याला अटक केले आहे. ज्याचा खून झाला आहे त्याचे नाव पोलिसांनी संजीव दत्ता (४०) असे सांगितले असून तो आसाम राज्यातील होता. तो या ठिकाणी कंपनीमध्ये नोकरीच्या शोधात आला होता.  

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक