शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

धक्कादायक ! मोबाईलवरील संभाषणादरम्यान गैरसमजातून जावयाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:23 IST

याप्रकरणी एक अटकेत, तर चार जण फरार आहेत

ठळक मुद्देकोरोनामुळे जावई आला होता गावी

आष्टी : तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे ८ जून रोजी फोनवर झालेल्या संभाषणाच्या गैरसमजातुनच कोरोनामुळे गावात आलेल्या जावयाचा खून करण्यात आला तर, अन्य एकास गंभीर मारहाण करण्यात आली आहे. ही घटना  ही घटना ९ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. 

संजय वलवळे (वय ४०) असे मृत जावयाचे नाव आहे तर गावातील दादा खिळे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. अशोक राजाराम खिळे यांचे जावई संजय वळवळे व गावातीलच दादा खिळे हे दोघे ८ जून रोजी एकत्र बसून गप्पा मारत होते. यावेळी संजय वळवळे याने खिळे यांचे जावाई रामेश्वर घुले याला फोन लावला. त्यावेळी त्या दोघांत फोनवर संभाषण सुरू असताना त्याचवेळी दादा खिळे संजयला  काहीतरी म्हणाला. मात्र  फोन चालू असल्यामुळे दादा खिळे आपल्यालाच बोलल्याचा घुले यांचा गैरसमज झाला. त्यामुळे रामेश्वर घुले याने त्याच्या सासरवाडीच्या लोकांना ‘दादा खिळे व संजय वळवळे हे दोन व्यक्ती सासरवाडीबद्दल अपशब्द बोलले असून त्या दोघांकडे बघा’ असे मोबाईलवरून सांगितले. 

या गोष्टीचा राग धरून जाब विचारण्यासाठी  चार ते पाच जणांनी दादा खिळे यांना मारहाण करून नंतर ते संजय वळवलेच्या घरी गेले. यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि संजयला बेदम मारहाण केली. जखमी संजयला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले डॉक्टरने तपासले असता, संजयचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आरोपी कल्याण सोनाबा खिळे याला ताब्यात घेण्यात आले आहे.

कोरोनामुळे जावई आला होता गावीमुंबई येथे एका खासगी कंपनीत संजय वलवळे हे नोकरी करतात. मात्र, कोरोना संकट आल्यामुळे ते त्यांची पत्नी मुलांसोबत सासरवाडीत आले होते. काही दिवसांपुर्वी ते गावात आल्यामुळे सर्वांशी त्यांच्या संवाद चांगला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनBeedबीडArrestअटक