शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

धक्कादायक ! मोबाईलवरील संभाषणादरम्यान गैरसमजातून जावयाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:23 IST

याप्रकरणी एक अटकेत, तर चार जण फरार आहेत

ठळक मुद्देकोरोनामुळे जावई आला होता गावी

आष्टी : तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे ८ जून रोजी फोनवर झालेल्या संभाषणाच्या गैरसमजातुनच कोरोनामुळे गावात आलेल्या जावयाचा खून करण्यात आला तर, अन्य एकास गंभीर मारहाण करण्यात आली आहे. ही घटना  ही घटना ९ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. 

संजय वलवळे (वय ४०) असे मृत जावयाचे नाव आहे तर गावातील दादा खिळे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. अशोक राजाराम खिळे यांचे जावई संजय वळवळे व गावातीलच दादा खिळे हे दोघे ८ जून रोजी एकत्र बसून गप्पा मारत होते. यावेळी संजय वळवळे याने खिळे यांचे जावाई रामेश्वर घुले याला फोन लावला. त्यावेळी त्या दोघांत फोनवर संभाषण सुरू असताना त्याचवेळी दादा खिळे संजयला  काहीतरी म्हणाला. मात्र  फोन चालू असल्यामुळे दादा खिळे आपल्यालाच बोलल्याचा घुले यांचा गैरसमज झाला. त्यामुळे रामेश्वर घुले याने त्याच्या सासरवाडीच्या लोकांना ‘दादा खिळे व संजय वळवळे हे दोन व्यक्ती सासरवाडीबद्दल अपशब्द बोलले असून त्या दोघांकडे बघा’ असे मोबाईलवरून सांगितले. 

या गोष्टीचा राग धरून जाब विचारण्यासाठी  चार ते पाच जणांनी दादा खिळे यांना मारहाण करून नंतर ते संजय वळवलेच्या घरी गेले. यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि संजयला बेदम मारहाण केली. जखमी संजयला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले डॉक्टरने तपासले असता, संजयचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आरोपी कल्याण सोनाबा खिळे याला ताब्यात घेण्यात आले आहे.

कोरोनामुळे जावई आला होता गावीमुंबई येथे एका खासगी कंपनीत संजय वलवळे हे नोकरी करतात. मात्र, कोरोना संकट आल्यामुळे ते त्यांची पत्नी मुलांसोबत सासरवाडीत आले होते. काही दिवसांपुर्वी ते गावात आल्यामुळे सर्वांशी त्यांच्या संवाद चांगला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनBeedबीडArrestअटक