भोजपुर जिल्ह्यातील रतनगढ गावात मंगळवारी रात्री झालेल्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सिगरेट शिलगावण्यासाठी माचिसची काडी मागण्यावरून झालेला वाद इतका टोकाला गेला की, थेट हाणामारी आणि हत्याकांड घडलं. या वादात सुरुवातील दोघांमध्ये मारामारी सुरू झाली होती. मात्र, यानंतर त्यांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या.यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एकला अटक केली असून, तिघांचा शोध सुरू आहे.
घटनास्थळावरून पाच गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात दोन्ही पक्षांनी एफआयआर दाखल केला आहे. एका बाजूने दोन जणांची, तर दुसऱ्या बाजूने एकाचे नाव समोर आले आहे. बुधवारी जारी केलेल्या प्रेस निवेदनात एसपी राज यांनी ही माहिती दिली.
माचिसवरून सुरू झाला वाद
त्यांनी माहिती देताना सांगितले की, मंगळवारी रात्री साडेआठ वाजता रतनगढ गावात दोन तरुणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींची चौकशी, तपास आणि दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांशी झालेल्या संभाषणातून असे दिसून आले की, मंगळवारी रात्री रतनगढ गावात मो. सोनू आणि चंदन कुमार सिंह उर्फ मांझिल यांच्यात सिगारेट ओढण्यासाठी माचिसची पेटी मागण्यावरून वाद झाला होता.
गोळीबारात दोघांचा मृत्यू
त्यादरम्यान, प्रथम दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. एका बाजूला मो. सोनू आणि दुसऱ्या बाजूला चंदन कुमार सिंह उर्फ मंजिल यांचा गोळी लागून मृत्यू झाला. एएसपी परिचय कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा तपास करण्यात आला. त्या अनुषंगाने घटनास्थळावरून पाच काडतुसे जप्त करण्यात आली. यानंतर, आरोपी विष्णू साह याला हत्येत वापरलेल्या पिस्तूलसह अटक करण्यात आली. इतर दोन आरोपींना अटक करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाकडून सध्या तपास सुरू असून,लवकरच दोघांनाही अटक करण्यात येईल.