शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शॉकींग! अनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी भावानेचे केली २ सख्ख्या बहिणींची हत्या

By निखिल म्हात्रे | Updated: October 23, 2023 14:48 IST

गणेश मोहीते यांचे आपल्या दोन बहीणी व आई सोबत पटत नसे. यांच्यामध्ये सतत प्राॅपर्टी व अनुकंपाच्या नोकरीवरून वाद होत असत.

अलिबाग - अनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी उच्च शिक्षित भावाने दोन सख्या बहिणींना विषारी औषध देऊन त्यांची हत्या केली. याप्रकरणात आरोपी गणेश यांनी पोलिसांना चुकीची माहीती देऊन पोलिसांनी चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी विविध युक्त्या लढवून घटनेची सविस्त माहीती घेऊन अखेर आरोपी गणेशच्या हाता बेड्या ठोकल्या.

गणेश मोहीते यांचे आपल्या दोन बहीणी व आई सोबत पटत नसे. यांच्यामध्ये सतत प्राॅपर्टी व अनुकंपाच्या नोकरीवरून वाद होत असत. या गोष्टीचा मनात राग धरून गणेश ने डोक शांत ठेऊन आपल्या दोन्ही बहीनींना फिल्मी स्टाईलने संपवायचे असे ठरविले. त्यानुसार मागील रविवारी पिण्यासाठी सुप बनवून त्यामध्ये विषारी औषध टाकून दोन्ही बहीणींना गणेशने संपविले. गणेशने गुगलच्या माध्यमातून सर्च करून कोणत्या विषारी औषधाला जेवणातून वा पाण्यातून देताना वास येणार नाही याची खात्री करण्यासाठी साधारणता 53 वेळा गुगल वरून माहीती घेतली असल्याचे तपासात समोर आले असल्याची माहीती जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग तालक्यातील चौल येथील भोवाळे गावात जेवणातून विषबाधा झाली असल्याने सोनाली मोहिते (वय 34) व स्नेहल मोहिते (वय 30) या दोन बहिणींनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोनालीचा 16 आॅक्टोबर 2023 रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हि घटना रेवदंडा पोलिस ठाण्यात मिळाली असता आरोपी गणेश मोहिते याची फिर्याद घेवुन अकस्मात मृत्यू म्हणून दाखल करण्यात आला. सोनाली मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असता तिचा मृत्यु जेवणातील विषबाधेमुळे झाला असल्याचे समोर आले. तर दुसरी बहिण स्नेहल मोहिते (वय 30) हिला उलट्याचा त्रास होत असल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती. स्नेहलला पुढील उपचारासाठी एम.जी.एम रुग्णालय पनवेल येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. स्नेहलचा मृत्युपूर्व जबाब नोंद केला आहे.

याबाबात स्नेहल व तिची आई जयमाला मोहिते यांनी सांगीतले गणेशने सोनाली व स्नेहाला सूप दिल्यानंतर पाणी पिण्यासाठी तांब्या भरून घराबाहेर ठेवला होता. त्यावेळी भावकीतील नातेवाईक त्यांना मारण्याच्या उद्देशाने विष टाकले असावे त्यामुळेच तिच्या मुली मयत झाल्या असाव्यात असा संशय व्यक्त केला होता. कारण जयमाला मोहीते व त्यांच्या नातेवाईकांमध्ये बरेच वर्षापासून मालमत्तेच्या वादातून भांडण सुरु होते. या गोष्टीचा मनात राग धरून माझ्या मुलींबर विष प्रयोग झाला असल्याचे सांगितले. मात्र घटनास्थळी जाऊन प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता प्राॅपर्टी व अनुकंपाच्या नोकरी वरूनच गणेश याने आपल्या बहीणींना संपविले असल्याचे समोर आले. तसेच आरोपी गणेश मोहीते याने आपणच दोन्ही बहीणींना संपविले असल्याचा कबुली जबाब हि दिला असल्याचे अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

या घटनेचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विशाल शिर्के, पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलिस हवालदार प्रतिक सावंत, यांनी केला आहे.

टॅग्स :RaigadरायगडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस