शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पत्नीचा गळा चिरून पतीची रेल्वेखाली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 15:25 IST

तालुक्यातील खळबळजनक घटनेप्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली

ठळक मुद्देउरण तालुक्यातील जासई गावात रोजगाराच्या निमित्ताने राजकुमार राय हा कामगार आपली पत्नी आणि तीन मुलींसह राहाण्यास आला होता.अधिक तपास करताना पोलिसांना त्याच दिवशी रांजणपाडा गावाजवळच मालगाडीच्या रुळावर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली.

मधुकर ठाकूरउरण - उरण तालुक्यातील जासई गावात बिहारमधून रोजगाराच्या निमित्ताने आलेल्या किरण देवी राय (२५ ) हिची पतीने तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्घुणपणे हत्या केली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पती राजकुमार राय (३०) यानेही रांंजणपाडा नजीक रेल्वेखाली आत्महत्या केली असल्याचे आढळून आले आहे. तालुक्यातील खळबळजनक घटनेप्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी दिली.उरण तालुक्यातील जासई गावात रोजगाराच्या निमित्ताने राजकुमार राय हा कामगार आपली पत्नी आणि तीन मुलींसह राहाण्यास आला होता. बिहार राज्यातून २० दिवसांपूर्वी आलेला राजकुमार सुपरवायझर म्हणून टीआयपीएल या कंपनीत काम करीत होता. मंगळवारी रात्रीच्या दरम्यान अज्ञात कारणावरून राजकुमार याने संतापाच्या भरात पत्नीचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्दयीपणे हत्या केली. पत्नीच्या निर्घृणपणे केलेल्या हत्येनंतर पस्तावलेल्या राजकुमारने जासई गावाजवळच असलेल्या रांजणपाडा गावाबाहेर मालगाडीखाली जीव दिल्याचे आढळून आले आहे.खुनाची घटना समजताच एसीपी विठ्ठल दामगुडे आणि उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी  पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आईचा मृतदेह आणि मृतदेहाच्या बाजूलाच अजाण तीनही मुलींचा चाललेला आक्रोश पाहून क्षणभर पोलिसांचेही डोळे पाणावले.पोलिसांनी तपासाला सुरुवात करताच पती राजकुमार घटनास्थळावरून गायब झाल्याचे आढळून आले. अधिक तपास करताना पोलिसांना त्याच दिवशी रांजणपाडा गावाजवळच मालगाडीच्या रुळावर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. या मृतदेहाची ओळख पटली असून तो राजकुमार याचाच असल्याची खातरजमा पोलिसांकडून करण्यात आली आहे.  पत्नीच्या हत्येनंतर पती राजकुमार राय याने झालेल्या पश्चातापानंतर  रेल्वेखाली आत्महत्या केली असल्याची शक्यता वपोनि जगदिश कुलकर्णी यांनी माहिती देताना व्यक्त केली आहे.तसेच मातृपित्रु छत्र हरपलेल्या या तीनही मुलींना बालसंगोपन केंद्रात पाठविण्यात आल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.या प्रकरणी एसीपी विठ्ठल दामगुडे आणि उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक अतुल अहेर व गौतम तायडे  अधिक तपास करीत आहेत. मात्र, या खळबळजनक घटनेमुळे उरण परिसरात खळबळ माजली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याMurderखूनPoliceपोलिस