शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

सावधान, एकट्या महिलांच्या स्पर्शासाठी ‘तो’ आसूसलाय!, साताऱ्यात धक्कादायक प्रकार

By दत्ता यादव | Updated: March 16, 2023 23:49 IST

‘त्याचे’ विकृत हात शोधतायत निर्जनस्थळ

दत्ता यादव/ सातारा, लोकमत न्यूज नेटवर्क: शांत व शिस्तप्रीय साताऱ्यात आता भलतंच घडू लागलंय. शहरातून सायंकाळी फिरणाऱ्या महिलांच्या मनात आता असुरक्षित भावाना निर्माण होऊ लागलीय. त्याचं कारण म्हणजे ‘तो’ महिलांच्या स्पर्शासाठी आसूसलाय. त्याचे विकृत हात निर्जन ठिकाण पाहून महिलांना लक्ष्य बनवतोय. हा धक्कादायक प्रकार दोन महिलांच्या बाबतीत नुकताच घडला असून, त्या अनोळखीवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय.

सातारा शहर तसं पाहिलं तर महिलांसाठी अत्यंत सुरक्षित मानलं जातं. रात्री अपरात्री निर्धास्तपणे महिला घराबाहेर पडू शकतात. इतकी सुरक्षितता साताऱ्यातील महिलांच्या मनात फार पूर्वीपासूनच आहे. परंतु अलीकडे शहरामध्ये सातत्याने कुठे ना कुठे तरी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. यातील दोन घटनांनी मात्र शहरातील महिलांच्या मनात भीतीदायक वातावरण तयार झालंय. एक तीस वर्षीय नोकरदार महिला रात्री आठ वाजता एकटीच दुचाकीवरून पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरमधून निघाली होती. यावेळी एका दुचाकीस्वाराने ग्रेडसेपरेटरमध्ये असलेली शांतता आणि कमी वर्दळ पाहून त्या महिलेचा पाठलाग केला. ग्रेड सेपरेटरमध्ये पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीने महिलेच्या कमरेला स्पर्श केला. अचानक घडलेल्या या घटनेने संबंधित महिला भयभीत झाली. हा घृणास्पद प्रकार केल्यानंतर संबंधित दुचाकीस्वार तेथून पसार झाला. काही क्षणातच ही घटना घडली. अशा परिस्थितीतही संबंधित महिलेने त्या विकृत व्यक्तीच्या गाडीचा नंबर पाहिला. ग्रेड सेपरेटरमधून बाहेर आल्यानंतर त्या महिलेने आपल्यासोबत घडलेला हा प्रसंग घरातल्यांना सांगितला. यानंतर हासारा प्रकार साहजिकच पोलिसांपर्यंत पोहोचला. परंतु आता प्रश्न उरतोय तो, त्या विकृत व्यक्तीच्या मनोवृत्तीचा. असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी साताऱ्यातील समर्थ मंदिर परिसरातील बोगद्यात सुद्धा घडला होता. या प्रसंगाची पुनरावृत्ती झाल्याने त्या विकृताचे हे भलतेच चाळे पोलिसांनी ठेचून काढणे गरजेचे आहे. तरच महिलांच्या मनात घरकरून बसलेली भीती निघून जाईल. शिवाय अशा प्रकारचे कृत्य पुन्हा कोणी करण्याचे धाडस करायचे नाही, अशा प्रकारची अद्दल त्या विकृत व्यक्तीला घडविण्याची गरज आहे.

नोकरदार अन् महाविद्यालयीन तरुणींचे सर्वाधिक विनयभंग

सातारा शहरामध्ये गेल्या सहा महिन्यांत १८ विनयभंगच्या घटना घडल्या असून, यामध्ये नोकरदार महिला आणि महाविद्यालयीन तरुणींचा सर्वाधिक समावेश आहे. विनयभंग करणारे हे नोकरदार महिलेचे सहकारी तर महाविद्यालयीन तरूणींचे वर्गमित्र, नातेवाईक, शेजारी असल्याचे समोर आले आहे. रस्त्यामध्ये विनयभंगाच्या घटना फार कमी घडत आहेत. अशा प्रकारच्या सर्वाधिक घटना या कार्यालय आणि घरात होत आहेत. 

सीसीटीव्ही कूचकामी..

शहरामध्ये ३४ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र, हे सीसीटीव्ही चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे आरोपींचे चेहरे आणि त्यांच्या गाडीचा नंबर स्पष्टपणे दिसून येत नाही. यामुळे पोलिसांना तपासामध्ये प्रचंड अडथळे येत आहेत.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसर