शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तच्या अडचणी वाढणार? राजीव गांधी हत्येतील एजी पेरारीवलन याची उच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 07:22 IST

राजीव गांधी हत्या प्रकरण; संजय दत्तच्या मुदतपूर्व सुटकेची मागितली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एजी पेरारीवलन उर्फ अरीवू याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या मुदतपूर्व सुटकेविषयी माहिती मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

अरीवू आणि संजय दत्त या दोघांनाही आर्म्स अ‍ॅक्टअंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र, संजय दत्त शिक्षा संपवून कारागृहाबाहेर आल्याने त्याची मुदतपूर्व सुटका कशाच्या आधारे केली, याची माहिती अरीवू याने मगितली. माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागूनही ती न देण्यात आल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.

राजीव गांधी यांच्या हत्येसाठी वापरलेल्या बॉम्बकरिता दोन नऊ व्होल्टच्या बॅटरी जोडल्या होत्या. त्या अरीवू यांनी पुरविल्याचा आरोप ठेवून वयाच्या १९ व्या वर्षी त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांनतर असे सिद्ध झाले की, अरीवू याला बॅटरी कशासाठी वापरण्यात येणार होती, याची कल्पना नव्हती.

संजय दत्तची दया याचिक राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर आणि त्याला ठोठावलेली शिक्षा केंद्राच्या अखत्यारितील कायद्यांतर्गत असूनही महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करून संजय दत्तच्या शिक्षेची मुदत संपण्याआधी सुटका केली. महाराष्ट्र सरकारने कोणती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संजय दत्तची लवकर सुटका केली, याची माहिती मिळविण्यासाठी अरीवूने मार्च २०१६ मध्ये माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून माहिती मगितली. मात्र येरवडा कारागृहाचा माहिती देणारा अधिकारी आणि पुणे जिल्हा माहिती कार्यालयाकडून माहिती देण्यात आली नाही. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व संजय दत्तच्या मुदतपूर्व सुटकेची माहिती द्यावी, अशी विनंती अरीवू याने याचिकेद्वारे केली.

टॅग्स :Sanjay Duttसंजय दत्तRajiv Gandhiराजीव गांधी