शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

संजय दत्तच्या अडचणी वाढणार? राजीव गांधी हत्येतील एजी पेरारीवलन याची उच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 07:22 IST

राजीव गांधी हत्या प्रकरण; संजय दत्तच्या मुदतपूर्व सुटकेची मागितली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एजी पेरारीवलन उर्फ अरीवू याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या मुदतपूर्व सुटकेविषयी माहिती मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

अरीवू आणि संजय दत्त या दोघांनाही आर्म्स अ‍ॅक्टअंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र, संजय दत्त शिक्षा संपवून कारागृहाबाहेर आल्याने त्याची मुदतपूर्व सुटका कशाच्या आधारे केली, याची माहिती अरीवू याने मगितली. माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागूनही ती न देण्यात आल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.

राजीव गांधी यांच्या हत्येसाठी वापरलेल्या बॉम्बकरिता दोन नऊ व्होल्टच्या बॅटरी जोडल्या होत्या. त्या अरीवू यांनी पुरविल्याचा आरोप ठेवून वयाच्या १९ व्या वर्षी त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांनतर असे सिद्ध झाले की, अरीवू याला बॅटरी कशासाठी वापरण्यात येणार होती, याची कल्पना नव्हती.

संजय दत्तची दया याचिक राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर आणि त्याला ठोठावलेली शिक्षा केंद्राच्या अखत्यारितील कायद्यांतर्गत असूनही महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करून संजय दत्तच्या शिक्षेची मुदत संपण्याआधी सुटका केली. महाराष्ट्र सरकारने कोणती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संजय दत्तची लवकर सुटका केली, याची माहिती मिळविण्यासाठी अरीवूने मार्च २०१६ मध्ये माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून माहिती मगितली. मात्र येरवडा कारागृहाचा माहिती देणारा अधिकारी आणि पुणे जिल्हा माहिती कार्यालयाकडून माहिती देण्यात आली नाही. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व संजय दत्तच्या मुदतपूर्व सुटकेची माहिती द्यावी, अशी विनंती अरीवू याने याचिकेद्वारे केली.

टॅग्स :Sanjay Duttसंजय दत्तRajiv Gandhiराजीव गांधी