शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

Sachin Vaze: सीएसएमटीहून हिरेन यांचा सोबत घेऊन सचिन वाझेचा प्रवास; NIA टीम पोहचली ठाण्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 07:37 IST

या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी वाझेला घेऊन एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांचे पथक गुरुवारी ठाण्यातील मनसुखचा मृतदेह मिळालेल्या मुंब्रा रेतीबंदर खाडीजवळ तसेच या खाडीपासून ४०० मीटर अलीकडे असलेल्या ठिकाणी गेले होते.

ठाणे : ठाणे न्यायालयाने मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) बुधवारी (दि. २४) सोपवल्यानंतर मुख्य आरोपी सचिन वाझेला गायमुख आणि मुंब्रा रेतीबंदर खाडी परिसरात गुरुवारी सायंकाळी उशिरा आणले होते. हा खून नेमका कशा प्रकारे करण्यात आला याची माहिती आणि घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांनी यावेळी केला.

या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी वाझेला घेऊन एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांचे पथक गुरुवारी ठाण्यातील मनसुखचा मृतदेह मिळालेल्या मुंब्रा रेतीबंदर खाडीजवळ तसेच या खाडीपासून ४०० मीटर अलीकडे असलेल्या ठिकाणी गेले होते. मनसुख यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह घटनास्थळापासून ४०० मीटर अलीकडे टाकल्याचा एनआयएच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. तसेच घोडबंदर रोडवरील गायमुख खाडीजवळ तावडे असे नाव सांगत विनायक शिंदे मनसुख यांना भेटला होता. त्या ठिकाणीही सुरुवातीला वाझेला नेण्यात आले. त्यानंतर मुंब्रा रेतीबंदर खाडीपाशी काही काळ वाझे याची चौकशी केल्यानंतर हे पथक त्याला घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने परत गेले. दोनच दिवसांपूर्वी विनायक शिंदे याला घेऊन एटीएसचे पथक घटनास्थळी गेले होते. सध्या खून प्रकरणात वाझे याला ३ एप्रिलपर्यंत एनआयएची कोठडी न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी ठाण्यातील सर्व घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न एनआयएचे पथक करीत आहे. शिवाय, जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हत्या प्रकरणाचा एकमेकांशी कसा संबंध आहे, याचीही चाचपणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

.......................

बेपत्ता काडतुसांचे काय झाले?

वाझे याला सरकारी रिव्हॉल्व्हर आणि ३० काडतुसे मिळाली होती. परंतु, त्याच्या घरझडतीमध्ये रिव्हॉल्व्हर आणि केवळ पंचवीस काडतुसे मिळाली. इतर काडतुसांचे काय झाले? याचीही यावेळी विचारपूस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली

 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा