शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बळजबरीने, फसवणूक करून मोबाईल चोरणाऱ्या सराईत चौकडीला अटक; १२ गुन्हे उघड

By धीरज परब | Updated: December 14, 2022 20:40 IST

आरोपींकडून विविध कंपन्याचे २८ मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी असा ५ लाख ७४ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. 

मीरारोड -  मोबाईल कव्हर गिफ्ट देतो सांगून त्यात काचेचा तुकडा टाकत लोकांचे मोबाईल लंपास करणे वा बळजबरी हातातून मोबाईल हिसकावणाऱ्या चौकडीला काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे. मेरठ व दिल्लीचे हे आरोपी असून आतापर्यंत १२ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींकडून विविध कंपन्याचे २८ मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी असा ५ लाख ७४ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. 

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत मुन्शी कंपाउंड येथील पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावर मोहम्मद नूर मोहम्मद खान हा काम करत असताना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईल दुकान कुठे अशी विचारणा केली. नूर ह्याला बोलण्यात गुंगवत ता इसमाने मोबाईल कव्हर देतो सांगून त्याचा मोबाईल हातचलाखीने लंपास करत कव्हर मध्ये काचेचा तुकडा टाकून दिला. 

तो इसम व त्याचा साथीदार दुचाकी वरून आलेला साथीदार मोबाईल घेऊन पळून जात असताना नूर ह्याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते धक्का मारून पळून गेले.  त्याचा गुन्हा १० डिसेंबर रोजी काशीमीरा पोलिसांनी दाखल केला होता. अश्या प्राकाराच्या घटना शहरात वाढल्या असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, गुन्हे प्रकटीकरणचे निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, उपनिरीक्षक निखिल चव्हाण व प्रकाश कावरे सह सचिन हुले, हणमंत तेरवे, परेश पाटील, निलेश शिंदे, सुधीर खोत, राहुल सोनकांबळे, रवींद्र कांबळे व जयप्रकाश जाधव यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज सह तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला. 

पोलिसांना सदर गुन्ह्यातील आरोपी हे कुर्ला भागातून सापडले.  सोनु मलिक, दानिश जाहीद मलिक, मोहमद साजीद अब्दुल कादीर राजपूत हे तिघे आरोपी उत्तर प्रदेशच्या मेरठ भागातील तर सागर विनोद वर्मा हा नवीदिल्लीच्या  शहादरा भागात राहणारा आहे. ह्या आरोपींची एकट्या काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत ५ गुन्हे केले आहेत.  नवघर पोलीस ठाणे हद्दीत २ गुन्हे तर मीरारोडचे नयानगर, भाईंदर,  पेल्हार, खडकपाडा व मुंबईच्या गोवंडी पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी १ असे एकूण १२ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

लोकांना त्यांचा मोबाईल खरेदी करायचा सांगून, मोबाईल कव्हर गिफ्ट देतो सांगून मोबाईल हातचलाखीने लांबवणे वा बळजबरी मोबाईल खेचून पळून जाण्याची आरोपींची कार्यपद्धती आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना ह्या आधी अटक केली होती. गुन्हा करण्यासाठी मेरठ व दिल्ली वरून आरोपी यायचे आणि शहरात लॉज मध्ये रहायचे. गुन्हे करून पार्ट गावी पळायचे अशी माहिती संजय हजारे यांनी दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिस