शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

बळजबरीने, फसवणूक करून मोबाईल चोरणाऱ्या सराईत चौकडीला अटक; १२ गुन्हे उघड

By धीरज परब | Updated: December 14, 2022 20:40 IST

आरोपींकडून विविध कंपन्याचे २८ मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी असा ५ लाख ७४ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. 

मीरारोड -  मोबाईल कव्हर गिफ्ट देतो सांगून त्यात काचेचा तुकडा टाकत लोकांचे मोबाईल लंपास करणे वा बळजबरी हातातून मोबाईल हिसकावणाऱ्या चौकडीला काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे. मेरठ व दिल्लीचे हे आरोपी असून आतापर्यंत १२ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींकडून विविध कंपन्याचे २८ मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी असा ५ लाख ७४ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. 

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत मुन्शी कंपाउंड येथील पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावर मोहम्मद नूर मोहम्मद खान हा काम करत असताना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईल दुकान कुठे अशी विचारणा केली. नूर ह्याला बोलण्यात गुंगवत ता इसमाने मोबाईल कव्हर देतो सांगून त्याचा मोबाईल हातचलाखीने लंपास करत कव्हर मध्ये काचेचा तुकडा टाकून दिला. 

तो इसम व त्याचा साथीदार दुचाकी वरून आलेला साथीदार मोबाईल घेऊन पळून जात असताना नूर ह्याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते धक्का मारून पळून गेले.  त्याचा गुन्हा १० डिसेंबर रोजी काशीमीरा पोलिसांनी दाखल केला होता. अश्या प्राकाराच्या घटना शहरात वाढल्या असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, गुन्हे प्रकटीकरणचे निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, उपनिरीक्षक निखिल चव्हाण व प्रकाश कावरे सह सचिन हुले, हणमंत तेरवे, परेश पाटील, निलेश शिंदे, सुधीर खोत, राहुल सोनकांबळे, रवींद्र कांबळे व जयप्रकाश जाधव यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज सह तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला. 

पोलिसांना सदर गुन्ह्यातील आरोपी हे कुर्ला भागातून सापडले.  सोनु मलिक, दानिश जाहीद मलिक, मोहमद साजीद अब्दुल कादीर राजपूत हे तिघे आरोपी उत्तर प्रदेशच्या मेरठ भागातील तर सागर विनोद वर्मा हा नवीदिल्लीच्या  शहादरा भागात राहणारा आहे. ह्या आरोपींची एकट्या काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत ५ गुन्हे केले आहेत.  नवघर पोलीस ठाणे हद्दीत २ गुन्हे तर मीरारोडचे नयानगर, भाईंदर,  पेल्हार, खडकपाडा व मुंबईच्या गोवंडी पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी १ असे एकूण १२ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

लोकांना त्यांचा मोबाईल खरेदी करायचा सांगून, मोबाईल कव्हर गिफ्ट देतो सांगून मोबाईल हातचलाखीने लांबवणे वा बळजबरी मोबाईल खेचून पळून जाण्याची आरोपींची कार्यपद्धती आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना ह्या आधी अटक केली होती. गुन्हा करण्यासाठी मेरठ व दिल्ली वरून आरोपी यायचे आणि शहरात लॉज मध्ये रहायचे. गुन्हे करून पार्ट गावी पळायचे अशी माहिती संजय हजारे यांनी दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिस