शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

रिक्षाचालकाला जबर मारहाण; रोकड, मोबाईलसह रिक्षाही पळविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 21:06 IST

Crime News : रिक्षा त्याठिकाणी आली असता तेथे आणखीन दोन प्रवासी आधी बसलेल्या प्रवाशांनी रिक्षात घेतले आणि रिक्षा पुर्वेतील काटेमानिवली येथे घेण्यास शेखला सांगितले.

कल्याण - जावेद शेख या रिक्षाचालकाला मारहाण करीत त्याच्याकडील मोबाईल रोकड आणि रिक्षा घेऊन पोबारा करणा-या पाच पैकी चौघा आरोपींना अवघ्या सहा तासात अटक करण्यात कोळसेवाडी पोलिसांना यश आले आहे. चार आरोपींमध्ये एक जण अल्पवयीन असून अन्य एकजण फरार आहे.अंबरनाथमध्ये राहणारा शेख बुधवारी रात्री 10 वाजता तेथील साईबाबा मंदिर जुना बस स्टॅण्डजवळ असताना एक महिला आणि पुरूष प्रवाशी त्यांच्या रिक्षात बसले आणि त्यांनी रिक्षा कल्याण पूर्वेकडील रेल्वे कवॉटर येथे घेण्यास सांगितले. रिक्षा त्याठिकाणी आली असता तेथे आणखीन दोन प्रवासी आधी बसलेल्या प्रवाशांनी रिक्षात घेतले आणि रिक्षा पुर्वेतील काटेमानिवली येथे घेण्यास शेखला सांगितले.

शेख रिक्षा काटेमानिवली पूलाकडे घेऊन जात असताना रिक्षात बसलेल्या चौघांपैकी एकाने त्याला चाकू दाखवून दमदाटी केली आणि ड वॉर्ड जवळील रस्त्यावर रिक्षा थांबविण्यास सांगितली. रिक्षा थांबविताच त्याठिकाणी आणखीन एक व्यक्ती आली आणि सर्वानी शेख याला मारहाण करण्यास सुरूवात केली. लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण केली गेली. यात शेख गंभीर जखमी झाले. याचा फायदा उठवित संबंधितांनी त्यांच्या खिशातील मोबाईल, 500 रूपये रोकड असलेली पर्स चोरली त्याचबरोबर शेख यांची रिक्षा देखील पळवून नेली. याप्रकरणी शेख यांनी कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठत पाच जणांविरोधात तक्रार दिली होती. दरम्यान सहा तासांच्या आत सहाय्यक पोलिस निरिक्षक हरीदास बोचरे पाटील यांच्या पथकाने सीसीटिव्हीच्या आधारे पाच पैकी चार आरोपींना अटक केली. आरोपी उल्हासनगरमधील राहणारे आहेत. मुख्य आरोपी करण दखनी हा उल्हासनगरमधील सराईत गुन्हेगार आहे. त्याची पत्नी चैताली पाटील आणि मित्र कुणाल जाधव याचाही अटक आरोपींमध्ये समावेश आहे. अन्य एक अटक आरोपी अल्पवयीन असून त्याची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहीती बोचरे पाटील यांनी दिली.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिसkalyanकल्याणArrestअटकRobberyचोरी