शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी तबलिगी विरोधातील गुन्हे रद्द; औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 01:16 IST

खंडपीठ । तबलिगी जमातीला बळीचा बकरा बनविण्यात आले

औरंगाबाद : दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज प्रकरणातील तबलिगी जमातच्या भारतीय आणि विदेशी याचिकाकर्त्या तबलिगींविरोधात दाखल केलेले गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी रद्द केले आहेत.

न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. शेवलीकर यांच्यापुढे १४ विदेशी नागरिकांनी दाखल केलेल्या तीन फौजदारी याचिकांवर २१ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली असता ‘कोरोना काळात तबलिगी जमातीला बळीचा बकरा बनविण्यात आल्याचे’ निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे. आइवरी कोस्ट, घाना, टांझानिया, बेनीन येथील १४ विदेशी नागरिकांनी अ‍ॅड. शेख मजहर जहागीरदार यांच्यामार्फत दाखल केलेल्या तीन फौजदारी याचिकांवरील सुनावणी ११ आॅगस्ट रोजी निकालाकरिता राखून ठेवली होती. खंडपीठाने २१ ऑगस्ट रोजी त्याचा निकाल घोषित केला. ३० भारतीय आणि पाच परदेशी तबलिगींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यापैैकी १४ जणांनी याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीच्या मरकजमध्ये आलेल्या परदेशी लोकांविरुद्ध मुद्रित आणि दृक्श्राव्य माध्यमांमध्ये मोठा अपप्रचार करण्यात आला.

भारतात फैलावलेल्या कोविड-१९ च्या संक्रमणाला हे परदेशी जबाबदार आहेत, अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली. तबलिगी जमातीला बळीचा बकरा बनविण्यात आले. याचिकाकर्त्यांच्या विरोधात अशा पद्धतीची कारवाई व्हायलाच नको होती, असे सध्याच्या भारतातील संक्रमणाच्या आकडेवारीवरून दिसते. त्यावर पश्चाताप करण्याची आणि नुकसानभरपाईसाठी पाऊल उचलणे गरजेच आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. लॉकडाऊन काळात विविध भागांतील मशिदींमध्ये राहून, नमाज अदा करून लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या गुप्त माहितीवरून याचिकाकर्त्यांना अटक करण्यात आली होती. भारत सरकारने दिलेल्या वैध व्हिसाद्वारे याचिकाकर्ते भारतात आले होते, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

विमानतळावर त्यांचे स्क्रीनिंग आणि कोविड-१९ ची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना विमानतळ सोडण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यांनी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना त्यांच्या आगमनाची माहिती दिली होती. २३ मार्चला लॉकडाऊनमुळे वाहनांना बंदी घालण्यात आली होती. हॉटेल आणि लॉज बंद होते. परिणामी, याचिकाकर्त्यांना मशिदीमध्ये आश्रय घ्यावा लागला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले नव्हते, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या उत्तरात म्हटल्यानुसार याचिकाकर्ते मुस्लिम धर्माचा प्रचार करताना आढळले. म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. पाच विदेशींना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले होते. क्वॉरंटाईननंतर त्यांना औपचारिक अटक दाखविली होती. सर्व सार्वजनिक स्थळे बंद करण्याचा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश असताना याचिकाकर्ते तबलिगी मरकजमध्ये सहभागी झाले होते. तपासणी करून घेण्याचे आवाहन केले असताना याचिकाकर्ते तपासणी करण्यास पुढे आले नाहीत. त्यांनी कोविड-१९ पसरवण्याची भीती निर्माण केली. अशाच प्रकारच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सहायक सरकारी वकील नेरलीकर यांनी निदर्शनास आणून दिले.‘अतिथी देवो भव’चे पालन करतो का?अतिथी देवो भव, हे आपले ब्रीदवाक्य आहे. आपण आपल्या महान संस्कृती आणि परंपरेप्रमाणे वागतो का, असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. कोरोनाच्या काळात आपण आपल्या पाहुण्यांप्रति आणि विशेषता याचिकाकर्त्यांप्रती अधिक संवेदनशील असावयास हवे होते. त्यांना मदत करण्याऐवजी कोरोना पसरवतात, असे म्हणून त्यांना तुरुंगात डांबले, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.

विविध कलमांखाली गुन्हे दाखलयाचिकाकर्त्याविरुद्ध भा.दं.वि. कलम १८८, २६९, २७० आणि २९०, महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७(१)(३) सह १३५, महाराष्ट्र कोविड-१९ मेजर अँड रुल्सचे नियम ११, एपिडेमिक डिसिजेस अ‍ॅक्ट १८९७ चे कलम २, ३ आणि ४, फॉरेनर्स अ‍ॅक्ट १८९७ चे कलम १४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब) याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय