शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

प्रेयसीच्या तक्रारीवरून दाखल केलेला खटला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 02:24 IST

पाच वर्षांनी प्रेमसंबंध संपुष्टात आल्यावर सांताक्रुझ येथील तरूणावर आणि त्याच्या कुटुंबियांवर युवतीने केलेले विनयभंग आणि फसवणुकीचा गुन्हा रद्दबातल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे मुुख्य न्या. रंजन गोगई, न्या. नवीन सिन्हा आणि न्या. कुरीयन जोसेफ यांच्या खंडपीठाने अलिकडेच दिला.

मुंबई : पाच वर्षांनी प्रेमसंबंध संपुष्टात आल्यावर सांताक्रुझ येथील तरूणावर आणि त्याच्या कुटुंबियांवर युवतीने केलेले विनयभंग आणि फसवणुकीचा गुन्हा रद्दबातल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे मुुख्य न्या. रंजन गोगई, न्या. नवीन सिन्हा आणि न्या. कुरीयन जोसेफ यांच्या खंडपीठाने अलिकडेच दिला.एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतलेली तक्रारदार युवती आणि जयेंद्र आयरे हे फेसबुक फ्रेंड झाले आणि त्यानंतर ते प्रेमात पडले. आरोपीने आपल्याला आक्षेपार्ह छायाचित्रे आणि मेसेज पाठवल्याचे तिचे म्हणणे होते. डिसेंबर २0१५ मध्ये दोघांचे कुटुंबिय भेटले आणि त्यांनी दोघांचा विवाह करण्याचे ठरवल्याचे तिने म्हटले होते. मात्र एप्रिल २0१६ मध्ये विवाह मोडल्यानंतर युवतीने आयरे आणि त्याच्या कुटुंबियांविरूद्ध तक्रार दाखल केली. वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला रद्दबातल करण्यात यावा, यासाठी आरोपीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आरोपीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. तेथे अ‍ॅड. महेश वासवानी यांनी या प्रकरणी आरोपीतर्फे काम पाहिले.दोघांचे पाच वर्षे प्रेमसंबंध होते. ते तुटल्यानंतर विनयभंगाचे आरोप करणे उचित नाही. साखरपुड्यासाठी खर्च केलेली रक्कम त्यांना परत करण्यास तयार असल्याचे अ‍ॅड. महेश वासवानी यांनी मांडले. सूड घेण्यासाठी केले जाणारे आरोप अशा निर्णयामुळे थांबतील, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Courtन्यायालय