शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

"सॉरी पप्पा, काहीच शिल्लक राहिलं नाही..."; सरकारी नोकरी न मिळाल्याने तरुणाचं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 19:09 IST

कन्हैयालालने एकदा रीट परीक्षा दिली होती. त्यात त्याला १३५ गुण मिळाले. यावेळी आपल्याला नोकरी मिळेल असा विश्वास त्याला होता. मात्र परीक्षा रद्द झाली.

राजस्थानच्या हनुमानगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याने कीटनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. गेल्या सहा दिवसांपासून तो बेपत्ता होता. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह पोलिसांना सिंचन विभागाच्या रिकाम्या असलेल्या एका खोलीत आढळून आला. कन्हैयालाल असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याच्याजवळ कीटकनाशकाची रिकामी बाटली सापडली. तसेच बॅगेमध्ये एक सुसाईड नोट देखील सापडली आहे.

कन्हैयालालने सुसाईड नोट लिहिली आहे. "सॉपी पापा, माझ्याकडे आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. मी जातोय. तुम्ही स्वत:ची आणि सगळ्यांची काळजी घ्या. अनिल आणि सुनील दोन्ही भाऊ चांगले आहेत. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. पण मी काहीच करू शकलो नाही" अशा शब्दांत वडिलांसाठी पत्र लिहून कन्हैयालालने टोकाचा निर्णय घेतला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैयालालने एकदा रीट परीक्षा दिली होती. त्यात त्याला १३५ गुण मिळाले. यावेळी आपल्याला नोकरी मिळेल असा विश्वास त्याला होता. मात्र परीक्षा रद्द झाली. त्यानंतर त्यानं वनपाल पदाची परीक्षा दिली. मात्र ती परीक्षाही रद्द करण्यात आली. त्यानंतर कन्हैयालालनं पुन्हा रीट परीक्षेची तयारी सुरू केली. पण सतत परीक्षा रद्द झाल्याने तो तणावाखाली होता.

तणावाला कंटाळून कन्हैयालालने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. २४ डिसेंबरला कन्हैयालालचा वरिष्ठ शिक्षक भरतीचा सामान्यज्ञानाचा पेपर होता. मात्र परीक्षेआधीच त्याने सुसाईड केलं. विशेष म्हणजे हा पेपरही लीक झाला. कन्हैयालालचा मोठा भाऊ धर्मपाल सरकारी शिक्षक आहे.

सरकारी नोकरी मिळत नसल्याने, परीक्षा सातत्याने रद्द होत असल्यामुळे कन्हैयालालने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. परीक्षा रद्द होत असल्यानं तो तणावाखाली होता. त्यामुळेच त्यानं टोकाचं पाऊल उचललं. दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. कन्हैयालालच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी