शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

प्रेमविवाहाचा राग; बाप आणि भावाकडून भररस्त्यात गोळ्या झाडून मुलीसह जावई आणि नातीचीही हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 20:31 IST

जोडप्याचा सुखी संसार सुरू होता. मात्र आता दोन वर्षांनंतर कुटुंबाचा विरोध मावळला असेल असा विचार करून दोघेही आपल्या मूळ गावी राहायला आले.

Honour killing ( Marathi News ) : आधुनिक काळातही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असतात. अशीच एक घटना बिहारमधील भागलपूरमध्ये घडली असून प्रेमविवाहाला असलेल्या विरोधातून वडील आणि भावाने तरुणीसह तिच्या पती आणि मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर येथील गोपाळपूर परिसरात राहणाऱ्या चंदा देवी आणि चंदन कुमार यांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र चंदाच्या कुटुंबीयांच्या या प्रेम प्रकरणाला विरोध होता. त्यामुळे चंदा देवी आणि चंदन कुमार यांनी २०२१ मध्ये पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांचा विरोध असल्याने लग्नानंतर दोघेही दूर जाऊन राहात होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता. मात्र आता दोन वर्षांनंतर कुटुंबाचा विरोध मावळला असेल असा विचार करून दोघेही आपल्या मूळ गावी राहायला आले. मात्र आजचा दिवस या जोडप्यासाठी भयंकर ठरला.

चंदा देवी आणि चंदन आपल्या २ वर्षीय मुलीसह कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर वाटेत दबा धरून बसलेल्या चंदाचे वडील पप्पू सिंह आणि भाऊ धीरज कुमार यांनी त्यांना अडवलं आणि गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. या गोळीबारात चंदा आणि चंदन या जोडप्यासह त्यांची २ वर्षीय मुलगीही जागीच ठार झाली. प्रेमविवाहाच्या रागातून घडलेल्या या घटनेनं बिहारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, या तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र अजूनही आरोपींना पकडण्यात यश आलं नसून जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी