शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Pulwama Attack : पुलवामा हल्ल्याचं मुंबई कनेक्शन ?

By पूनम अपराज | Updated: February 22, 2019 17:48 IST

एटीएसच्या अटकेत असलेल्या मुंब्र्यातील तरुणानं काश्मीरला पाठवले 15 हजार

ठळक मुद्देपुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं कनेक्शन मुंबईशी जोडले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तलाहने त्याच्या बँक खात्यातून जम्मू - काश्मीरमध्ये १५ हजार रुपये पाठविल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं कनेक्शन मुंबईशी जोडले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)  ऐन प्रजासत्ताक दिनादिवशी मुंब्रा येथे जाऊन उमत मोहम्मदीया ग्रुपच्या संपर्कात असलेल्या तलाह ऊर्फ अबुबकर हनिफ पोतरीक (२४) या तरुणास अटक केली होती. या तलाहने १५ हजार रुपये बँकेमार्फत जम्मू काश्मीरला पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, महाराष्ट्र एटीएस सर्व बाजूंनी अधिक तपास करत असल्याचे एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  अन्न आणि पाण्यातून केमिकल हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या १० जणांना एटीएसने कारवाई करत औरंगाबाद आणि मुंब्रा येथून अटक केली होती. सर्वात शेवटी एटीएसने मुंब्रा येथील  दोस्ती प्लॅनेट एमरॉल्ड टॉवरमधून तलाहला अटक केली होती. त्याच्या चौकशीत ही खळबळजनक माहिती उघड झाली आहे. 

तलाहने त्याच्या बँक खात्यातून जम्मू - काश्मीरमध्ये १५ हजार रुपये पाठविल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, त्याने पुलवामा हल्ल्याआधी पैसे पाठविले होते का?, ते कोणाला पाठविले होता ?, या बँक व्यवहारामागील उद्देश काय ? तसेच या व्यवहारामागे पुलवामा हल्ल्याचा काही संबंध आहे का ? अशा सर्व बाजूंनी एटीएस तपास करत आहेत. राज्य एटीएसने मोठी कारवाई करत औरंगाबाद येथील संभाजीनगरातील चार आणि मुंब्य्रातील पाच अशा एकूण नऊ जणांना 22 जानेवारी रोजी अटक केली होती. यानंतर २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला तलाह याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून एटीएसने लॅपटॉप, राऊटर, काही मोबाईल, हार्ड डिक्स, टॅबलेट, पेनड्राइव्ह जप्त केले होते. जप्त केलेल्या लॅपटॉपमधून एटीएसला महत्वाच्या धाग्यादोऱ्यांची माहिती मिळण्याची शक्यता होती. तलाह हा विक्रोळी येथे यापूर्वी राहत होता. मात्र, सात - आठ महिन्यांपूर्वी तलाहने मुंब्रा येथे आपल्या आजोबांकडे राहण्यास गेला होता. त्याच्यासोबत आजोबा, आई राहत असे तर वडील नोकरीच्या निमित्ताने दुबईत वास्तव्याला आहेत. आजोबांच्या घरी तलाह दहशतवादी कट रचत होता. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाAnti Terrorist SquadएटीएसArrestअटकmumbraमुंब्राMONEYपैसाbankबँक